कल्याण-डोंबिवलीत भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत, शिंदे गटाचे टेन्शन वाढले

कल्याण-डोंबिवलीत भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत, शिंदे गटाचे टेन्शन वाढले

 स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात धुसफूस वाढली आहे. एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून तणाव वाढला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने चालवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.

रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत.ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याविषयी नाराजी आहे. या पाश्र्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणुकीत शिंदे गटाशी काडीमोड घेण्याची तयारी चालवली आहे. रविवारी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचना दिल्या. केडीएमसी निवडणुकीत जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा असे थेटपणे त्यांनी सांगितले. 100 टक्के एका विचाराचे म्हणजेच भाजपचे सरकार आणायचे आहे असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. एकूणच भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.

महायुती शंभर टक्के फुटणार

कल्याण-डोंबिवलीसाठी विकास निधी देऊनही काही नगरसेवकांकडून योग्य काम झाले नाही. जाणीवपूर्वक काहींनी अडचणी आणल्या असे म्हणत त्यांनी प्रत्यक्ष शिंदे गटावर टीका केली. महापालिकेत स्वबळावर भाजपची सत्ता आली तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील असे चव्हाण यांनी सांगितल्याने महायुती शंभर टक्के फुटणार असा दावा कार्यक्रम ठिकाणी भाजप कार्यकर्ते करत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
असं म्हणतात की, आनंद हा दुसऱ्यांना दिल्यावर अधिक वाढतो. म्हणूनच आनंदी राहणे हे आपल्या तब्येतीसाठी उत्तम मानले जाते. आनंदी राहण्यासाठी...
‘सेन्यार’चा धोका, पुढील ४८ तास महत्त्वाचे; या राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा
जेम्स वेब टेलिस्कोपचे मोठे यश; विश्वातील सर्वात जुने तारे सापडल्याची शक्यता, अनेक रहस्य उलगडणार
राज कपूर यांचा मुंबईतील बंगला ‘देवनार काॅटेज’ किती कोटींना विकला गेला, वाचा
हिंदुस्थानात अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा धोका वाढला, लॅन्सेंटच्या अहवालानुसार 83 टक्के रुग्ण आढळले
मुंबईतील भुयारी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल
घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, कानाचा तोडला लचका; मुलाची प्रकृती गंभीर