स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मर्यादेबाबत निर्णायक सुनावणी; कोर्टाच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मर्यादेबाबत निर्णायक सुनावणी; कोर्टाच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालय मंगळवारी ठरवणार आहे. 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर व चंद्रपूर या दोन महापालिकांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या निवडणुका कोर्टाच्या कचाटय़ात सापडल्या आहेत. आरक्षण मर्यादेत न ठेवल्यास निवडणुका रोखू, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे असल्याने मंगळवारच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गाला 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदा आणि पालिकांच्या निवडणुकांतील एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेबाहेर गेले आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या 2021 मधील आदेशाचे उल्लंघन आहे. याकडे लक्ष वेधत विकास गवळी यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला फटकारले होते. आरक्षण मर्यादा ओलांडली तर निवडणुका रोखू, असा निर्वाणीचा इशारा खंडपीठाने दिला आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. गेल्या आठवडयात निवडणूक आयोग आणि सरकारने वाढीव वेळ मागितला. उर्वरित निवडणुकांची अधिसूचना तूर्तास काढणार नसल्याची हमी निवडणूक आयोग आणि सरकारने दिली होती. त्यामुळे मंगळवारची सुनावणी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, तातडीने उपाययोजना करा; शिवसेनेची मागणी मुंबईत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, तातडीने उपाययोजना करा; शिवसेनेची मागणी
पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढत असताना आता नॅशनल पार्कलगत असणाऱ्या मालाड पूर्व येथील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स...
समरजीत सिंग यांना अखेर डिस्चार्ज, ‘सामना’च्या दणक्यानंतर रुग्णालय प्रशासन नमले
इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग
बिग बॉस मराठी पुन्हा येतोय…
न्या. सूर्य कांत यांनी पदभार स्वीकारला
मतदार यादीत घोळ, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच कबुली
मतदार यादीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! आदित्य ठाकरे यांची मागणी