इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग

इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग

हिंदुस्थानच्या दिशेने एक नवेच संकट येण्याची शक्यता आहे. इथिओपिया या देशातील गेल्या 10 हजार वर्षांपासून सुप्त असलेला हॅले गुब्बी नावाचा ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला. त्यामुळे लाल समुद्राला लागून असलेल्या आखाती देशांवर राख आणि विषारी वायुचे ढग पसरले आहेत. ते सोमवारी रात्री उशीरा दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे काही विमान पंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देशातील सर्व विमान पंपन्यांना अलर्ट जारी केला आहे.

हॅले गुब्बी हा ज्वालामुखी इथिओपियातील अफार प्रदेशात आहे. तो सुमारे 10 हजार वर्षांपासून शांत होता. मात्र, अचानक झालेल्या उद्रेकामुळे शास्त्रज्ञांचे लक्ष त्याकडे वेधले आहे. हा भाग अतिशय दुर्गम असून तेथे कोणतीही मॉनिटरिंग यंत्रणा नाही. स्पह्ट झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साइडचे मिश्रण असलेले ढग आकाशात सुमारे 15 किलोमीटर उंचीपर्यंत दाटले आहेत. ते हिंदुस्थानच्या दिशेने सरकत राजस्थान, पंजाब आणि दिल्लीपर्यंत सोमवारी रात्री उशीरा पोहोचले. त्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अकासा, इंडिगो तसेच केएलएम या पंपन्यांनी काही उड्डाणे रद्द केली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, तातडीने उपाययोजना करा; शिवसेनेची मागणी मुंबईत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, तातडीने उपाययोजना करा; शिवसेनेची मागणी
पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढत असताना आता नॅशनल पार्कलगत असणाऱ्या मालाड पूर्व येथील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स...
समरजीत सिंग यांना अखेर डिस्चार्ज, ‘सामना’च्या दणक्यानंतर रुग्णालय प्रशासन नमले
इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक, दिल्लीत पोहोचले विषारी ढग
बिग बॉस मराठी पुन्हा येतोय…
न्या. सूर्य कांत यांनी पदभार स्वीकारला
मतदार यादीत घोळ, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच कबुली
मतदार यादीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! आदित्य ठाकरे यांची मागणी