बिबट्यांच्या नसबंदीला राज्य सरकारकडून परवानगी, जेरबंद करण्यासाठी AI चा वापर होणार

बिबट्यांच्या नसबंदीला राज्य सरकारकडून परवानगी, जेरबंद करण्यासाठी AI चा वापर होणार

बिबट्याच्या हल्ल्यात जुन्नर, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या भागांत गेल्या दोन महिन्यांत चौदा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, तसेच मंत्री गणेश रामचंद्र नाईक यांनी बैठक घेतली. यात बिबट्यांची नसबंदी करणे आणि ते जंगलातून बाहेर आले की त्यांना पकडणे यावर चर्चा झाली.

वन विभागाला केंद्र सरकारकडून दिलेल्या अटींनुसार परवानगी मिळाली आहे आणि तीही केवळ जुन्नर विभागासाठी,” अशा माहिती रामचंद्र नाईक यांनी दिली. तसेच सर्व विभागांसाठी परवानगी मागणार असून सध्या उपलब्ध 200 पिंजऱ्यांव्यतिरिक्त आणखी 1 हजार पिंजरे उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून बिबट्यांना पकडता येईल.सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे बिबट्यांच्या हालचालींबद्दल गावकऱ्यांना सतर्क करता येईल.सॅटेलाइटचा वापर आणि AI च्या मदतीने जर बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला तर तीन किलोमीटरच्या परिसरात सायरन वाजेल,” असे नाईक म्हणाले.

जुन्नरमध्ये गेल्या दोन महिन्यांत बिबट्यांनी तीन जणांचा बळी घेतला. नाशिक आणि अहिल्यनगर जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपासून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या भागांत ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबटे उसातून बाहेर येऊन केव्हाही हल्ला करू शकतात, अशी भीती गावकऱ्यांमध्ये आहे.

याशिवाय बिबटे रहिवासी भागात प्रवेश करू लागले आहेत. गणेश नाईक यांचे मत आहे की शहरीकरणासाठी झाडांची कत्तल आणि धरणांच्या बांधकामामुळे अनेक बिबटे जंगलाबाहेर पडून मानवी वस्तीत येत आहेत.

“जुन्नर आणि शिरूर परिसरात चिलेवाडी, माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे यांसारख्या धरणांचे बांधकाम झाले. तसेच या भागात शहरीकरण वाढले आहे,” असे नाईक म्हणाले. “मानवी वस्तीत बिबट्यांचे येण्यामागील कारण म्हणजे घरांच्या आसपास असणारे जनावरं, कुत्री, कुक्कुटपालन व इतर लहान जीव,” असेही त्यांनी पुढे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमक; 1 कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षली हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीताराम जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून...
दिल्ली स्फोटप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अल फलाह ट्रस्टसंबंधित 24 ठिकाणी छापे
पाकिस्तानी रॅपरने नेपाळमध्ये फडकवला ‘तिरंगा’; पाकड्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या आमदाराने पुन्हा त्याच रस्त्याचे भूमिपूजन करत असताना उडाला गोंधळ, काँग्रेससह स्थानिकांची भाजप आमदारासोबत शाब्दिक चकमक
उकडलेल्या चण्याचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
सोलो ट्रिप करणाऱ्या तरुणीसमोर अश्लील चाळे; शरीरसंबंधांची मागणी करत हस्तमैथून केले, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?
शिक्षा सुनावली पण अंमलबजावणीच नाही, शेख हसीना यांना बांग्लादेशला सुपुर्द करण्याची शक्यता कमीच