नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिले टेकऑफ; मुहूर्त कोणता? ख्रिसमसचा की वाजपेयींच्या जयंतीचा, दि. बा. पाटील यांच्या नावाबाबत भूमिपुत्रांमध्ये संभ्रम

नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिले टेकऑफ; मुहूर्त कोणता? ख्रिसमसचा की वाजपेयींच्या जयंतीचा, दि. बा. पाटील यांच्या नावाबाबत भूमिपुत्रांमध्ये संभ्रम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमानाचे पहिले टेकऑफ येत्या २५ डिसेंबर रोजी होणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू होत असल्याचा बोलबाला सर्वत्र होत असला तरी त्याच दिवशी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचीही जयंती आहे. त्यामुळे विमानतळाच्या टेकऑफचा मुहूर्त नेमका कोणता, ख्रिसमसचा की अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाजपेयी यांच्या जयंतीदिनी नवी मुंबईतून विमानाच्या उड्डाणाचा शुभारंभ होणार असल्याने विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लागणार की नाही याबाबत स्थानिक भूमिपुत्रांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली. तसा प्रस्ताव राज्य सरकारने सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठवला. मात्र अद्यापपर्यंत या प्रस्तावावर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी दुपारी झाले. त्यावेळी मोदी यांनी विमानतळाच्या नावाबाबत कोणतीही घोषणा केली नाही. या उद्घाटन सोहळ्यानंतर विमानतळ हाताळणाऱ्या कंपनीने २९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचा ताबा सीआयएसएफकडे दिला.

पहिल्या टप्प्यात अकासा आणि इंडिगो या दोन विमान कंपन्या नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करणार आहेत. पहिले टेकऑफ २५ डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी ख्रिसमस आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असल्याने नेमका मुहूर्त कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला राज्य सरकारने अचानक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे नाव दिले. त्यानंतर विमानतळाच्या टेकऑफचा शुभारंभ वाजपेयी यांच्या जयंतीदिनीच ठेवला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.

३ डिसेंबरपर्यंत वाट पाहणार

दिबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आगरी कोळी समाजाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी दोन महिन्यांत दिबांचे नाव विमानतळाला देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तोपर्यंत दिबांचे नाव विमानतळाला लागले नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला थिटेंनी पहाटे भरला अर्ज रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला थिटेंनी पहाटे भरला अर्ज
राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू...
असं झालं तर… आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बंद झाला…
हिवाळ्यात त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी, जाणून घ्या
‘महावतार’ चित्रपटासाठी विकी कौशलने केला मद्यपान आणि मांसाहाराचा त्याग, वाचा
मातृभूमी सोडणे वेदनादायक, बांगलादेशची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू, शेख हसीना यांची युनूस सरकारवर जोरदार टीका
ठाण्यात महावितरणची 42 लाखांची वीजचोरी, रिमोट सर्किटच्या मदतीने फसवणूक
डिजिटल प्रायव्हसीला कायदेशीर संरक्षण; देशात लवकरच डेटा प्रोटेक्शन बोर्ड