तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?

तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?

बहुतेक घरांमध्ये, महिला या जॉबमुळे, किंवा वेळेआभावी सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. किंवा त्या कणकेच्या रोट्या, चपात्या आदल्या रात्रीच बनवल्या जातात आणि  दुसऱ्या दिवशी खाल्ले जातात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काहीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता, परंतु ते जास्त वेळ ठेवणे आणि नंतर ते खाणे खूप हानिकारक मानले जाते. त्याच पद्धीतीने मळलेले पीठ रेफ्रिजरेटरमध्ये किती काळ चांगले राहते आणि ते कधी खाऊ नये? तसेच रोजच फ्रिजमध्ये मळलेले पीठ ठेवणे योग्य आहे का हे देखील जाणून घेऊयात.

पोषक घटक

गव्हाच्या पिठामध्ये प्रथिने, स्टार्च, फायबर, बी-व्हिटॅमिन, फॉलिक अॅसिड, नियासिन आणि रिबोफ्लेविन, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असतात. पीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि भारतीय घरांमध्ये रोट्या, पराठे आणि पुरी बनवण्यासाठी वापरले जाते. तथापि, जर तुम्ही मळलेले पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर तुम्ही ते खाऊ नये. कारण ते कोणतेही पौष्टिक मूल्य शरीराला देत नाही.

पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने काय होते?

पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने आणि नंतर ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. पीठात रसायने तयार होऊ लागतात, जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. पीठात अनेक हानिकारक जीवाणू देखील वाढू शकतात.

पोटदुखी : बराच काळ साठवून ठेवलेले पीठ खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. पीठात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

आम्लपित्त : मळलेले पीठ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने मायकोटॉक्सिन तयार होतात, ज्यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होते.

पोषण: रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले पीठ फक्त खाण्यायोग्य असते. ते कोणतेही आरोग्यदायी फायदे देत नाही. ते त्याचे निरोगी पोषक घटक गमावते.

काय करायचं

जर तुम्ही सकाळी रेफ्रिजरेटरमध्ये कणिक ठेवत असाल तर ते करणे थांबवा. पीठ मळल्यानंतर कणिक अगदी 15 मिनिटांपर्यंत ठेवावी, त्यानंतर लगेच त्याच्या पोळ्या किंवा रोट्या बनवून खाव्यात.  रेफ्रिजरेटरमध्ये मळलेले पीठ ठेवाचंच असेल तर ते  1 ते 2 तासच ठेवा. रेफ्रिजरेटरमध्ये यापेक्षा जास्त काळ ठेवू नका. ते खाल्ल्याने समस्या निर्माण होतील. तसेच, जर पीठ काळे दिसत असेल किंवा त्याला वास येत असेल तर ते अजिबात खाऊ नका.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – काळेवाडीजवळ पीएमपीएमएल बसला आग, पिंपरी चिंचवडमध्ये 12 तासांतील दुसरी घटना Pune News – काळेवाडीजवळ पीएमपीएमएल बसला आग, पिंपरी चिंचवडमध्ये 12 तासांतील दुसरी घटना
पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी...
नौदल गोदीवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरू
Delhi Blast – दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या i20 कारच्या मालकाला अटक, उमरसोबत मिळून रचला होता कट
जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, 4 किमी उंचीपर्यंत उसळला लाव्हा, अनेक उड्डाणे रद्द
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात बंडखोरी, तिकीट न मिळाल्याने माजी नगरसेविकाने भरला उमेदवारी अर्ज
निष्पक्ष आणि पारदर्शकतेने निवडणुका झाल्या असत्या तर निकाल वेगळे असते; मायावती यांचा दावा
हे उत्तर कोरिया, चीन, रशियामधील निवडणुकांसारखे… सर्व मते एकाच पक्षाला जातात; बिहार निवडणूक निकालांवर दिग्विजय सिंग यांचं वक्तव्य