शास्त्रज्ञाची लेक ते आघाडीची अभिनेत्री

शास्त्रज्ञाची लेक ते आघाडीची अभिनेत्री

आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर कामिनी कौशल यांनी तब्बल सात दशके बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. एका महान वनस्पती शास्त्रज्ञच्या घरी जन्मलेल्या कामिनी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड. कॉलेजच्या दिवसापासूनच त्या रंगमंचावर काम करत होत्या. 1946 साली ‘नीचा नगर’ या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

कामिनी कौशल यांचा जन्म 16 जानेवारी 1927 रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील शिवराम कश्यप लाहोर येथील पंजाब विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. लहान वयातच कामिनी यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रोग्रामिंग सुरू केले. त्यानंतर त्यांनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात बीए (ऑनर्स) पदवी मिळवली. 1946मध्ये चेतन आनंद यांनी त्यांना ‘नीचा नगर’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटाने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता आणि ‘पाल्मे डी’ओर’ पुरस्कार जिंकणारा हा एकमेव हिंदुस्थानी चित्रपट राहिला.

दिलीप कुमार यांच्यासोबत केमिस्ट्री गाजली 

n कामिनी कौशल यांनी 1948मध्ये बी.एस. सूद यांच्याशी लग्न केले. कामिनी यांच्या मोठय़ा बहिणीचे ते पती होते. त्यांना दोन मुले होती. त्यांच्या बहिणीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आणि कामिनी कौशल यांनी त्यांच्या मुलांना वाढवण्यासाठी बहिणीच्या पतीशी लग्न केले. ‘शहीद’ चित्रपटात त्या दिलीप कुमार यांच्यासोबत दिसल्या. विवाहित असूनही या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. भावाच्या विरोधामुळे आणि कुटुंबाच्या नाराजीमुळे कामिनीला हे नाते संपवावे लागले.

गाजलेले चित्रपट

n ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करणाऱ्या कामिनी यांनी 1946 ते 1963 या कालावधीत ‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदिया के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘पारस’, ‘नमुना’, ‘आरजू’, ‘झंझर’, ‘आबरू’, ‘बडे सरकार, ‘जेलर’, ‘नाइट क्लब’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. साठच्या दशकात त्या चरित्र भूमिकांकडे वळल्या. ‘गोदान’, ‘शहीद’, ‘दो रास्ते’, ‘अनहोनी’, ‘प्रेम नगर’, ‘महा चोर’ यांसारख्या चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘कबीर सिंह’ चित्रपटात काम केले होते. आमीरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.़

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जैन बोर्डिंगचे खरेदीखत अखेर न्यायालयात रद्द जैन बोर्डिंगचे खरेदीखत अखेर न्यायालयात रद्द
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदी खत अखेर कायदेशीररीत्या रद्द करण्यास पुणे दिवाणी न्यायालयात शिक्कामोर्तब झाले. दि. 8...
असं झालं तर… गाडीचा ब्रेक फेल झाला तर…
शास्त्रज्ञाची लेक ते आघाडीची अभिनेत्री
ज्येष्ठ पर्यावरणवादी, ’पद्मश्री’ थिम्मक्का यांचे निधन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात बेवारस लाल बॅगमुळे घबराट, पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाची धावाधाव
प्रशांत दामले @13,333! विक्रमी प्रयोगानिमित्त 21 नोव्हेंबरला विलेपार्ल्यात होणार भव्य सत्कार
धर्मेंद्र यांचा आयसीयूतील व्हिडीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक