Mumbai News – मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली; गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर

Mumbai News – मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली; गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर

दिवाळीत पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरात प्रदूषण कमी पातळीवर राहिले. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 117 अंकांवर नोंदवला गेला. हवेमध्ये धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

शनिवारी वांद्रेमध्ये 112, वांद्रे कुर्ला संकुल येथे 147, भोईवाडा – 127, कुर्ला- 124, मालाड – 127 तसेच वडाळा ट्रक टर्मिनल परिसरात 139 अंक अशा प्रकारे हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत नोंदवली गेली. मात्र पुन्हा शुक्रवारी आणि शनिवारी हवेची मध्यम श्रेणीत नोंद झाली.

मुंबईकर आधीच उकाड्याने त्रस्त झाले असतानाच आता हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे त्यांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार असलेल्यांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रदूषित हवेत दीर्घकाळ काम करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च रक्तदाब असलेल्या रग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळावे उच्च रक्तदाब असलेल्या रग्णांनी ‘या’ पदार्थांचे सेवन टाळावे
कधी कधी उच्च रक्तदाब ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ही समस्या कायम राहिली तर तो उच्च रक्तदाबाचा आजार...
कोणत्या देशांमध्ये किडनीच्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण? जाणून घ्या
मध्यरात्री झोपेत असतानाच डोक्यात गोळ्या झाडल्या, भाजप नेत्याच्या हत्येने एकच खळबळ
अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय जमीन घोटाळा होऊ शकत नाही, काँग्रेस खासदाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
दिल्ली, मुंबईनंतर काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमानसेवा विस्कळीत
तात्यासाहेब माने यांची प्रभारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियक्ती जाहीर
Photo – उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद