दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’; प्रवाशांचे प्रचंड हाल! 300 उड्डाणे उशिराने… देशांतर्गत विमानांना 5 ते 6 तास उशीर

दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’; प्रवाशांचे प्रचंड हाल! 300 उड्डाणे उशिराने… देशांतर्गत विमानांना 5 ते 6 तास उशीर

हिंदुस्थानातील सर्वात व्यस्त असलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली. हवाई वाहतूक मंदावल्याने हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 300 हून अधिक विमानांचे उड्डाण उशिराने झाले. तर एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आलेल्या समस्येमुळे आतापर्यंत 200 हून अधिक विमानांचे दोन ते अडीच तासांहून अधिक उशिराने उड्डाण करण्यात आले. दरभंगाच्या स्पाइसजेटचे उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच काही छोट्या शहरातील उड्डाण पाच ते सात तासांपर्यंतच्या विलंबाने करण्यात आले.

दिल्ली ते वाराणसीचे विमान साडेसात तास उशिराने उड्डाण करण्यात आले. इंडिगोचे डेहराडूनला जाणारे विमानही पाच तास उशिराने उड्डाण करण्यात आले. या तांत्रिक समस्यांचा परिणाम झाल्यानंतर विमान कंपनी इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट आणि अकासा एअर यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केली. दिल्लीतील एटीसी बिघाडामुळे विमाने उशिराने धावत आहेत, असे सांगितले. दिल्लीच्या धावपट्टीवर पार्किंगची जागा अपुरी असल्याने विमान कंपन्यांना काही विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. दिल्ली विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशनमध्ये ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानांच्या उड्डाणांना विलंब होत आहे, अशी माहिती एअरपोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने देखील याची गंभीर दखल घेत फ्लाइटला विलंब होत असल्याची कबुली दिली. दिल्ली विमानतळावर दररोज 1 हजार 500 हून अधिक विमानांचे व्यवस्थापन केले जाते.

विमान कंपन्यांकडून दिलगिरी

एअर इंडिया आणि स्पाइसजेटसह अन्य काही एअरलाइन्सने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल डेटाला सपोर्ट करणारी ऑटोमेटिक मेसेज स्विचिंग सिस्टम (एएमएएसएस) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे त्यांनी म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर… हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर…
 टाचांना भेगा पडू नये, यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. पायाची बोटे, टाच मुलायम असावी असे प्रत्येकाला वाटते. जर...
दिल्लीत अग्नितांडव! रिठाळा मेट्रो स्थानकाजवळील झोपडपट्टीला आग; 500 झोपड्या जळून खाक, एकाचा मृत्यू
माली येथून पाच हिंदुस्थानींचे अपहरण; अल-कायदा व इसिसवर संशय
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानी आहे कोण?
अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला
प्रवासात अचानक सीएनजी संपल्यास…
दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’; प्रवाशांचे प्रचंड हाल! 300 उड्डाणे उशिराने… देशांतर्गत विमानांना 5 ते 6 तास उशीर