’वंदे मातरम्’ची 150 वर्षे, विशेष टपाल तिकीट जारी
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याच्या एक निनादाने प्रत्येक जण पेटून उठायचा, ते राष्ट्र गान ‘वंदे मातरम्’ 150 वर्षांचे झाले. या निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन करण्यात आले.
देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले. याकेळी उपस्थित डावीकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना. वंदे मातरम् निर्मितीच्या 150 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा येत्या संपूर्ण वर्षभर साजरा करण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List