“मुख्यमंत्री म्हणाले विषय गंभीर; चौकशी करून वास्तव…”, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

“मुख्यमंत्री म्हणाले विषय गंभीर; चौकशी करून वास्तव…”, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड अवघ्या 300 कोटींना खरेदी केला. केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने पदरात पाडून घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापाचा आगडोंब उसळला आणि त्यानंतर हा व्यवहार सद्द करण्यात आला. मात्र कंपनीची 99 टक्के मालकी असतानाही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही याचे उत्तर गृहमंत्री देऊ शकतात, असे ते म्हणाले.

अकोला येथे पत्रकार परिषदे दरम्यान माध्यम प्रतिनिधींनी पार्थ पवार जमीन घोटाळ्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली ते प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांना एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

सध्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार असून देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी हा एक गंभीर विषय असल्याचे जाहीरपणे सांगितले. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव त्यांनी समाजासमोर ठेवले पाहिजे. हे काम त्यांनी करावे ही अपेक्षा, असे शरद पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला असून सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे मजबूत पुरावे, गोष्टी असतील. त्या आधारे हा निर्ण घेतला असेल. यावेळी त्यांना शीतल तेजवानी आणि इतर आरोपींबाबत विचारले असता त्यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नाही. ज्यांनी याबाबत आरोप केले, त्यांनीच शोधून काढावे असे म्हटले.

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानी आहे कोण?

यावेळी शरद पवारांनी प्रशासन, राजकारण आणि कुटुंब यात फरक असल्याचे म्हटले. कुटुंबात आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता, अजित पवारांचा मुलगा माझ्या मुलीच्या विरुद्ध उभा होता. राजकारणात कुटुंब नाही तर विचारधारा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रामदेव बाबांनी सांगितलेले सकाळचे वार्मअप एक्सरसाईज करा आणि फिट राहा रामदेव बाबांनी सांगितलेले सकाळचे वार्मअप एक्सरसाईज करा आणि फिट राहा
निरोगी राहण्यासाठी नेहमी योग्य लाईफस्टाईल स्वीकारणे गरजेचे आहे. यात आहारापासून व्यायामाला सर्वाधिक महत्व आहे. आजच्या काळात अनेक लोक डेस्कचा जॉब...
Kokan News – दापोलीत पसरली दाट धुक्याची दुलई नागरिक सुखावले; वाहनचालक मात्र त्रस्त
Jammu Kashmir – कुपवाडात लष्कराचे ऑपरेशन पिंपल, दोन दहशतवादी ठार; शस्त्रे आणि दारुगोळा जप्त
बिहारमध्ये रस्त्यावर आढळल्या VVPAT स्लिप्स, आरजेडीने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
Mumbai News – कूपर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
मोदी सरकारने देशात एकही संस्था निर्माण केली नाही, मात्र त्यांनी सर्व प्रमुख उद्योग आपल्या मित्रांना सोपवले – प्रियांका गांधी
Photo – मराठवाडा दौऱ्याचा चौथा दिवस, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद