फसवणूक प्रकरण : उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला परदेशात जाण्याची परवानगी नाकारली

फसवणूक प्रकरण : उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला परदेशात जाण्याची परवानगी नाकारली

बॉलीवूड कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीय. या जोडप्यावर एका व्यक्तीने 60 कोटींची फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून शिल्पाला दिलासा मिळालेला नाही. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने लूकआऊट नोटीस जारी केली होती. याच कारणामुळे दोघांनाही तपास संस्था आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेश प्रवास करता येणार नाही.

शिल्पा शेट्टीला एका युट्युबच्या इव्हेंण्टसाठी कोलंबोत जायचे होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तिला देशबाहेर जाण्याची परवानगी नाकारली. शिल्पा शेट्टीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, शिल्पा शेट्टीला 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान एका युट्युबच्या इव्हण्टसाठी कोलंबोत जावे लागणार आहे. त्यावेळी न्यायालयाने त्या इव्हेण्टची निमंत्रण पत्रिका मागितली. त्यावेळी वकिलाने सांगितले की, तिला फोनवरुन निमंत्रण मिळाले आहे, त्याची पत्रिका तिथे पोहोचल्यावरच देण्यात येईल.

मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यावेळी न्यायालयाने सांगितले की, तिने प्रथम फसवणुकी प्रकरणातील 60कोटी रुपये भरावेत आणि नंतर ते परदेशात जाण्याची परवानगी मागू शकतात. या प्रकरणाची सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी आहे.

उद्योगपती दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या जोडप्याने प्रथम त्यांना 60 कोटी रुपये गुंतवण्यासाठी फसवले आणि नंतर ते पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा