लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून कॅनडामध्ये तीन ठिकाणी गोळीबार, कारणही केले स्पष्ट

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून कॅनडामध्ये तीन ठिकाणी गोळीबार, कारणही केले स्पष्ट

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी (५ ऑक्टोबर) उशिरा कॅनडामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. लॉरेन्स टोळीने सोशल मीडियाद्वारे जबाबदारी स्वीकारली. टोळीने सोशल मीडियावर गोळीबाराचे कारण स्पष्ट करणारी एक पोस्ट शेअर केली.

लॉरेन्स टोळीशी संबंधित फतेह पोर्तुगालने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली ज्यामध्ये दावा केला आहे की, नवी टेसी नावाच्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने लोकांकडून ५० लाख रुपये उकळले होते. म्हणूनच त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर गोळीबार करण्यात आला. बिश्नोई टोळीला नुकतेच कॅनडाने दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

बिश्नोई टोळीच्या नावाने काहीजण खंडणी वसूल करत आहेत. तसेच लोकांना धमकावत आहेत, म्हणूनच कॅनडात गोळीबार झाला. लॉरेन्स टोळीचा सदस्य फतेह पोर्तुगालने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सत श्री अकाल, सर्व बांधवांना राम राम. मी फतेह पोर्तुगाल आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कष्टाळू जनतेशी आमचे कोणतेही वैर नाही. कठोर परिश्रम करून उदरनिर्वाह करणाऱ्यांशी आमचे कोणतेही भांडण नाही. आता कोणी खोट्या बातम्या पसरवल्या तर व्यावसायिकांच्या जीवितहानी किंवा व्यवसायाच्या नुकसानाची जबाबदारी तुमची असेल, आमची नाही. आमच्या पद्धती चुकीच्या वाटू शकतात, परंतु आमचे हेतू चुकीचे नाहीत.” कॅनडाच्या सरकारने आधीच अधिकृतपणे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला दहशतवादी संघटना घोषित केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी
लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळवडे–आंब्रड मार्गावर घडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास...
ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ratnagiri News – परतीच्या पावसात हरभरा, पावटा, तूर पीक घेण्यास शेतकरी सरसावला; भात कापणीबरोबर केली जाते वायंगणी शेती
Jalna News – कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, चंदनझिरा पोलिसांची कामगिरी
Nanded News – बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 27 प्रवासी जखमी
ICC Women’s World Cup 2025 – श्रीलंकेच्या कर्णधाराची विक्रमाला गवसणी, असं करणारी पहिलीच खेळाडू
उमेदवारी अर्ज दाखल करताच RJD उमेदवाराला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?