हिंदुस्थानसाठी लोकशाहीवरील हल्ला सर्वात मोठा धोका! कोलंबियातून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

हिंदुस्थानसाठी लोकशाहीवरील हल्ला सर्वात मोठा धोका! कोलंबियातून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

हिंदुस्थानसाठी लोकशाहीवरील हल्ला सर्वात मोठा आहे, असे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. कोलंबियातील ईआयए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे.

हिंदुस्थानमध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. या सर्वांनाच लोकशाही व्यवस्थेत स्थान मिळायला हवे. पण सध्या लोकशाही व्यवस्थेवर चारही बाजूंनी हल्ला होत आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांशी बोलताना राहुल गांधी यांनी ऊर्जा संक्रमणाचा (Energy Transition) सिद्धांत मांडला. जेव्हा जेव्हा ऊर्जेत बदल होतो, तेव्हा तेव्हा नवीन साम्राज्ये उभी राहतात, असे राहुल गांधी म्हणाले. ब्रिटिशांनी वाफेचे इंजिन आणि कोळसा नियंत्रित केला आणि ते महासत्ता बनले. त्यानंतर अमेरिकेने कोळसा आणि वाफेवरून पेट्रोल आणि अंतर्गत ज्वलन इंजिनकडे होणारे संक्रमण यशस्वीरित्या हाताळले आणि ते महासत्ता बनले. आता आता आपण इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी नवीन संक्रमणाचा सामना करत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थान हा चीनचा शेजारी आणि अमेरिकेचा जवळचा भागीदार आहे. महासत्तांच्या शक्ती एकमेकांवर समोरासमोर येत असताना मध्यभागी आपण बसलो आहोत. आगामी 50 वर्षात हिंदुस्थान आणि चीनपैकी कोणता देश जगाचे नेतृत्व करताना दिसेल? असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, चीनबाबत मला माहिती नाही, पण हिंदुस्थान नक्कीच जगाचे नेतृत्व करू शकतो.

चीनपेक्षाही हिंदुस्थानची लोकसंख्या मोठी आहे. चीनच्या केंद्रीकृत व्यवस्थेऐवजी हिंदुस्थानची रचना विकेंद्रीकृत आणि विविधतापूर्ण आहे. हिंदुस्थानकडे एक प्राचीन आध्यात्मिक आणि वैचारिक परंपरा आहे, जी आजच्या आधुनिक जगासाठी उपयुक्त आहे. चीनप्रमाणे हिंदुस्थआन आपल्या लोकांचे दमन करू शकत नाही, असेही ते स्पष्ट म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक
Ranji Trophy 2025-26 पहिल्या दिवसापासूनच खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी ऋतुराज गायकवाड, केएस भारत, इशान किशन या...
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये संघाच्या कार्यक्रमांवरील बंदी, राज्य सरकारचा निर्णय
पुणे बाजार समितीने पणन मंत्र्यांना दाखवला कात्रजचा घाट, मंत्र्यांचे आदेश झुगारून बाजारात पुन्हा टपरी थाटली
दुबार मतदानासाठी आधार कार्डाचा वापर, रोहित पवारांनी दाखवलं प्रात्यक्षिक
Ratnagiri News – बांधकाम कारागीराने रस्त्यात सापडलेली तीन लाख रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे केली परत, संगमेश्वर बुरंबी मार्गावरील घटना
पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले
केन विल्यम्सनचे IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्स सोबत बुद्धिचा डाव टाकणार