लग्न करण्यासाठी आरोपीला जामीनावर सोडणे चुकीचे; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

लग्न करण्यासाठी आरोपीला जामीनावर सोडणे चुकीचे; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करण्याच्या दिंडोशी सत्र न्यायालयाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला. अशा गंभीर प्रकरणातील आरोपीला लग्न करण्यासाठी जामीनावर सोडून देणे अत्यंत चुकीचे आहे, असे निरिक्षण न्यायमूर्ती नीला गोखले यांनी नोंदवले आणि आरोपीला ताबडतोब डीएन नगर पोलिस ठाण्यात शरण येण्याचे निर्देश दिले. पीडित महिलेच्या ‘प्रायव्हेट पार्ट’ला कोणतीही इजा झाली नाही, असेही सत्र न्यायालयाने नमूद केले होते. सत्र न्यायालयाच्या या निर्णयावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अंधेरी परिसरातील महिलेवर तिघा मद्यपी पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलिस ठाण्यात 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींपैकी आकाश बिंदू याला त्याच्या लग्नासाठी दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तथापि, आरोपांचे गांभीर्य लक्षात घेत न्यायमूर्ती नीला गोखले यांनी आरोपी आकाश बिंदूचा जामीन रद्दबातल ठरवला.

दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेताना पुराव्यांकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेतलेले नाही. प्रकरणातील वस्तुस्थिती काहीशी चिंताजनक आहे हे कनिष्ठ न्यायालयाने गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक होते, अशी टिप्पणी न्यायमूर्ती गोखले यांनी जामीन रद्द करताना नोंदवली. आरोपीला 24 फेब्रुवारी रोजी जामिनावर सोडण्यात आले होते. त्याआधी तो जवळपास अडीच महिने न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील मेघा एस. बाजोरिया यांनी सत्र न्यायालयाच्या निकालावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक
Ranji Trophy 2025-26 पहिल्या दिवसापासूनच खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी ऋतुराज गायकवाड, केएस भारत, इशान किशन या...
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये संघाच्या कार्यक्रमांवरील बंदी, राज्य सरकारचा निर्णय
पुणे बाजार समितीने पणन मंत्र्यांना दाखवला कात्रजचा घाट, मंत्र्यांचे आदेश झुगारून बाजारात पुन्हा टपरी थाटली
दुबार मतदानासाठी आधार कार्डाचा वापर, रोहित पवारांनी दाखवलं प्रात्यक्षिक
Ratnagiri News – बांधकाम कारागीराने रस्त्यात सापडलेली तीन लाख रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे केली परत, संगमेश्वर बुरंबी मार्गावरील घटना
पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले
केन विल्यम्सनचे IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्स सोबत बुद्धिचा डाव टाकणार