सात-बारावरील नोंदी प्रलंबित ठेवल्यास आता भाऊसाहेबांना द्यावा लागणार जाब

सात-बारावरील नोंदी प्रलंबित ठेवल्यास आता भाऊसाहेबांना द्यावा लागणार जाब

महसूल विभागात सातबारा उताऱ्यावरील विविध प्रकारच्या नोंदी प्रलंबित राहिल्यास त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सनियंत्रण कक्षातून संपर्क साधला जाणार आहे. नोंदीच्या विलंबाची कारणे योग्य नसल्यास संबंधित तलाठी भाऊसाहेब, मंडल अधिकाऱ्याला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात येणार असून, त्यांना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

ज्या तलाठी सर्कल अथवा संबंधित अधिकाऱ्यांकडून नोंदी प्रलंबित राहिल्यास त्यास नोंदीच्या विलंबासाठी जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. सातबारा उताऱ्यावरील जमीन खरेदी-विक्री,
वारस नोंद करणे, बोजा कमी करणे यासारख्या नोंदी मर्यादित कालावधीत होणे अपेक्षित आहे.

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांकडून अनेक कारणास्तव नोंद घेण्यासाठी विलंब होत असल्याचे वारंवार आढळून आले आहे. नोंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांवर लाचलुचपत खात्याकडून कारवाईदेखील करण्यात आली. अर्ज करूनही
अनेकदा नोंदी केल्या जात नाहीत. या सर्व गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्या कक्षामार्फत जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणत्या तलाठी, मंडल अधिकाऱ्याकडे कोणत्या सात-बारा नियंत्रण कक्षातून थेट संपर्क करून विचारणा केली जाणार आहे.

दोन तलाठी नियुक्त
नियंत्रण कक्षामध्ये संबंधित तलाठी, मंडल अधिकाऱ्याला आता संपर्क साधण्यासाठी दोन तलाठ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्या तलाठ्यांमार्फत संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदी प्रलंबित का राहिल्या याची विचारणा करण्यात येणार आहे. प्रलंबित नोंदीबद्दल ठोस कारण देऊ शकले नाही, तर त्याला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बोलून विचारणा आणि कारवाई केली जाणार आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – क्षुल्लक वादातून बारबाहेरच टोळक्याकडून तरुणाची हत्या, मालाडमध्ये खळबळ Mumbai News – क्षुल्लक वादातून बारबाहेरच टोळक्याकडून तरुणाची हत्या, मालाडमध्ये खळबळ
हॉटेल व्यावसायिकाशी झालेल्या क्षुल्लक कारणातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाची हत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली. कल्पेश भानुशाली असे हत्या झालेल्या...
अमेरिकेतही क्रांतीची ठिणगी! डोनाल्ड ट्रम्प यांचा राइट हँड चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या
तरुणीने विनवण्या करुनही प्रियकर ऐकला नाही, धावत्या ट्रेनमधील तरुणाचे कृत्य व्हायरल
Sindhudurg Crime News – निर्दयी मुलाचा जन्मदात्या आईवर कोयत्याने हल्ला; मातेचा जागीच मृत्यू, कणकवली तालुका हादरला
हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! संजय सिंह यांच्या नजरकैदेवरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
Video – ‘आप’चे खासदार संजय सिंह नजरकैदेत, राजकीय वर्तुळात खळबळ
Video- सोलापुरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार