हरितालिका म्हणजे काय? कधी आणि कसे करावे व्रत? जाणून घ्या सविस्तर…

हरितालिका म्हणजे काय? कधी आणि कसे करावे व्रत? जाणून घ्या सविस्तर…

>> योगेश जोशी

सण उत्सवांचा महिना असलेला श्रावण आता संपला आहे. श्रावण संपल्यावर भाद्रपद महिन्यात वेध लागतात ते बाप्पाचे. आबालवृद्धांना प्रिय असणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी भाद्रपद महिन्यात येणारे पहिले वर्त म्हणजे हरतालिका….हरितालिका म्हणजे काय आणि हे कधी कसे करायचे याबाबत जाणून घेऊ या.

हरितालिकेचे व्रत भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला केले जाते. नावावरून हे व्रत शिवपार्वतीशी संबंधित असल्याचे लगेच समजते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. हरितालिका आपल्या संस्कृतीत महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले धार्मिक व्रत आहे. ‘हरिता’ म्हणजे ‘ अरण्यात जिला नेले ती’ आणि ‘लिका’ म्हणजे ‘सखी’. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून या व्रताला ‘हरितालिका’ असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. हरितालिकेची कथा आणि व्रताबाबतची माहिती भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.

हरितालिकेच्या निमित्ताने शिव म्हणजे पुरुषतत्व आणि पार्वती म्हणजे स्त्रीतत्व यांची पूजा करण्यात येते. पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली. तसेच हे व्रत केले. त्यामुळे कुमारिका चांगल्या पतीप्राप्तीसाठी हे व्रत करतात. तसेच विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. हे व्रत करताना वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात. तसेच काहीजण हरितालिका, सखी आणि पार्वती यांची मुर्ती आणतात. काही ठिकाणी पार्वती आणि तिच्या सखीच्या मूर्तीची पूजा करण्यात येते.

पुजेच्या सुरवातील व्रताचा संकल्प करून सोडषोपचारे पुजा करण्यात येते. त्यानंतर शिवपार्वती पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेची पद्धती असते. दिवसा पूजा झाल्यानंतर रात्री जागरण करून खेळ खेळतात आणि देवीची आराधना करण्यात येते. काही ठिकाणी या दिवशी करण्यात येणाऱ्या जागरणाला जगराता म्हणतात. दुसऱ्या दिवशी मांडलेल्या पूजेचे उद्यापन करून महिला उपवास सोडतात.

हरितालिका हे व्रत देशभरात विविध प्रकारे केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रामध्ये कुमारिका आणि विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. उत्तर भारतात हरितालिका तीज म्हणून हे व्रत केले जाते. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अटल सेतूवर कारला भीषण अपघात; डंपरच्या धडकेत अक्षरशः चुराडा, तरुण जागीच ठार अटल सेतूवर कारला भीषण अपघात; डंपरच्या धडकेत अक्षरशः चुराडा, तरुण जागीच ठार
अटल सेतूवर भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरची कारला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा होऊन त्यातील तरुणाचा जागीच...
T20 World Cup 2026 ची तोडफोड फटकेबाजी ‘या’ तारखेपासून सुरू होणार! फायनलचं ठिकाण अजूनही गुलदस्त्यात
Hingoli News – डोंगरकडा शिवारात भरधाव बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
Nanded News – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चार आठवडे बंद असलेली विमानसेवा सुरू होणार, प्रवशांना दिलासा
बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर झडप
Vice President Election Results – सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड
पोस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत डॉक्टर दाम्पत्याकडे खंडणीची मागणी, चौघांविरोधात गुन्हा दाखल