Nanded News – अतिवृष्टीने तोंडचा घास हिरावला, हताश शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं; मुलाच्या विरहात आईचाही मृत्यू

Nanded News – अतिवृष्टीने तोंडचा घास हिरावला, हताश शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं; मुलाच्या विरहात आईचाही मृत्यू

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यात शेतातील पिके वाहून गेली. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. सूर्यकांत मंगनाळे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून, याने शेतातच गुरुवारी गळफास घेवून आत्महत्या केली. तरुण मुलाच्या दुःखाच्या विरहाने शुक्रवारी आईनेही प्राण सोडले. मायलेकाच्या मृत्यूमुळे फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.

देऊबाई मंगनाळे असे मयत आईचे नाव आहे. नापिकी, कर्ज त्यातच अतिवृष्टीने पिकांची नासधूस झाली. सर्व पीक अतिवृष्टीत वाहून गेले. हे सर्व पाहून हताश झालेल्या अल्पभूधारक शेतकरी सूर्यकांत लक्ष्मणराव मंगनाळे (46) याने शेतातच गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा विरह सहन न झाल्याने आई देऊबाई मंगनाळे यांनीही शुक्रवारी सकाळी प्राण सोडला. गुरुवारी मुलावर तर शुक्रवारी ऐन पोळ्याच्या दिवशी आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. देऊबाई मंगनाळे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बँकेकडून काढलेले कर्ज, पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेले पैसे कसे फेडावे या विवंचनेतून सूर्यकांत मंगनाळे यांनी आत्महत्या केल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. सरकारच्या संवेदना आता तरी जाग्या व्हाव्यात आणि शेतकर्‍यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट