विनामीटर धावताहेत रिक्षा; प्रवाशांची लूट, अहिल्यानगरमध्ये प्रवाशांमधून संताप

विनामीटर धावताहेत रिक्षा; प्रवाशांची लूट, अहिल्यानगरमध्ये प्रवाशांमधून संताप

अहिल्यानगर शहरातील रिक्षा प्रवास आजही जुन्याच पद्धतीने सुरू आहे. रिक्षांमध्ये मीटर बसवणे आणि दरपत्रकानुसार प्रवाशांकडून भाडे घेणे, हे इतर शहरांत नियमाने होत असतानाही अहिल्यानगर शहरात ही व्यवस्था आजतागायत लागू झालेली नाही. परिणामी मनमानी भाडे आकारून लुटले जात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांत 1960-70 च्या दशकातच रिक्षांना मीटर लावण्याची सक्ती करण्यात आली. कालांतराने जीपीएस आधारित डिजिटल मीटर आणि ऍप-आधारित भाडेप्रणाली लागू झाली. मात्र, अहिल्यानगर शहरात अशा कोणत्याही तांत्रिक सुविधा अद्यापि आलेल्या नाहीत.

शहरातील रिक्षाचालक ठराविक भाडेदर न घेता, प्रवाशांच्या गरजेचा आणि वेळेचा गैरफायदा घेतात. उदाहरणार्थ दोन किलोमीटरच्या अंतराला पंधरा ते वीस रुपये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तीस ते चाळीस रुपये आकारले जातात. पावासाळा, सुट्टीचे दिवस आणि रात्रीच्या वेळी दरांमध्ये आणखी वाढ होते.

मुंबईत मीटर नसलेल्या रिक्षाला रस्त्यावर चालवण्यास परवानगी नाही. पुण्यातही डिजिटल मीटर व दरपत्रक काटेकोरपणे पाळले जाते. नागपुरात जीपीएस-मीटरची चाचणी यशस्वी ठरली असून, त्याद्वारे प्रवासाचा रेकॉर्ड सुरक्षित राहतो. याउलट अहिल्यानगर शहरात प्रवाशांना कोणताही हक्क सांगता येत नाही, कारण अधिकृत मीटरच नाही.

शहरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवासी संघटनांनी मीटर यंत्रणा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. दरपत्रक जाहीर करून जीपीएस-आधारित डिजिटल मीटर लावले, तर लूटमार थांबेल आणि वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता येईल, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

प्रशासनाची निक्रियता
वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, प्रस्ताव मांडले; पण अंमलबजावणी मात्र शून्य. काही वर्षांपूर्वी मीटर लावण्याची घोषणा झाली होती; परंतु पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही.

सुरक्षा व पारदर्शकतेचा प्रश्न
मीटर नसल्यामुळे दर ठरवताना रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात वाद होण्याचे प्रमाण जास्त आहे. बाहेरील प्रवाशांना तर योग्य भाडय़ाची कल्पना नसल्याने ते दुप्पट पैसे देतात. अशा वादातून अनेकदा धक्काबुक्की, भांडणं, अगदी मारहाणीपर्यंत प्रकरणं जातात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;