राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे आणि अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच आता हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्राला सतकर्तचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांमध्ये अधिक पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत ५०-६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

अनावश्यक प्रवास टाळावा

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे लागत आहे, त्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार तयारी करावी. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, अशीही सूचना प्रशासनाने केली आहे.

वाऱ्यामुळे झाड कोसळण्याच्या अनेक घटना

रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस दाखल झाला आहे. या पावसामुळे वीज पुरवठादेखील बंद करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल मोठ्या प्रमाणात वारे देखील वाहू लागले आहेत. नागोठणे, रोहा, पाली या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वारे वाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याण पूर्वेकडील रचना पार्क परिसरात एक झाड कोसळले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कल्याण पूर्व चिंचपाडा रोड परिसरात एक झाड रिक्षावर कोसळल्याने दोन वृद्ध प्रवासी अडकले आहेत. अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिक त्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. दहिसर पूर्वेकडील दलवी कंपाऊंड, बलिराम इंडस्ट्रीसमोर एस. व्ही. रोडवर जोरदार वाऱ्यामुळे एक झाड कोसळल्याने वाहतुकीला आणि स्थानिक नागरिकांना त्रास झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरळीच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई वरळीच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई
एका गुह्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता बेजबाबदार काम केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या निलंबनाची कारवाई...
शस्त्र विक्रीसाठी आलेल्यांना अटक
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची आगेकूच
Operation Sindoor – दहशतवादाविरुद्ध हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन सिंदूर’, पाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राइक
पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल…
समुद्राची पातळी इतक्या वेगाने का वाढत आहे? नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून चालकासह तिघांचा मृत्यू