कल्याण, डोंबिवलीतील शेकडो पर्यटकांनी केले बुकिंग रद्द; कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले

कल्याण, डोंबिवलीतील शेकडो पर्यटकांनी केले बुकिंग रद्द; कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीतील तिघा पर्यटकांनाही हकनाक जीव गमवावा लागला. दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर जम्मू-कश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जे कश्मीरमध्ये आहेत ते तेथून काढता पाय घेतायत, तर ज्यांना जायचं होतं त्यांनी पर्यटनाच्या प्लानला फुल्ली मारली आहे. गेल्या चार दिवसांत कल्याण, डोंबिवलीतील 600 ते 700 जणांनी बुकिंग रद्द करून जम्मू-कश्मीरला जाणे टाळले आहे. परिणामी शहरातील विविध ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयांत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मार्चमध्ये मुलांच्या परीक्षा झाल्या की अनेक जण पर्यटनाचा बेत आखतात. मात्र कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरला जाण्याची रिस्क कुणी घ्यायला तयार नाही. कश्मीरच्या आजूबाजूला असलेले लडाख, गुलमर्ग आदी भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंगदेखील भीतीपोटी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कल्याणमधील देशपांडे ट्रॅव्हल्सचे प्रथमेश देशपांडे यांनी सांगितले की 370 कलम हटवल्यानंतर कश्मीर व आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी पर्यटक वाढले होते. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 600 ते 700 बुकिंग होत असे. मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यानंतर नागरिक घाबरले आहेत.

दिवसभर फोन खणखणतायत
कश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी आम्हाला दिवसभर फोन येतायत. हल्ला होण्याच्या आदल्या दिवशीदेखील बुकिंगसाठी फोन येत होते. मात्र दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सरकारने पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी प्रथमेश देशपांडे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव आणि हल्ले आता संपले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण...
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार
India Pakistan Ceasefire : दोन्ही देशांमध्ये समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती – संरक्षण मंत्रालय
India Pakistan Ceasefire : युद्धविरामावर एकमत, पण दहशतवाद विरोधात कुठलीही तडजोड करणार नाही – एस जयशंकर
India Pakistan Tension – उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक! पाकिस्तानी हॅकर्सकडून दावा
India Pakistan Ceasefire – हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला, परराष्ट्र मंत्रालयाची शस्त्रसंधीची घोषणा