जगातील पहिल्या 10 जी ब्रॉडबँडचा दावा निघाला खोटा; चीनची पोलखोल, जपान आणि द. कोरिया पुढे

जगातील पहिल्या 10 जी ब्रॉडबँडचा दावा निघाला खोटा; चीनची पोलखोल, जपान आणि द. कोरिया पुढे

चीनने जगातील पहिला 10 जी ब्रॉडबँड नेटवर्प लाँच केलेला दावा चुकीचा आहे. कारण दक्षिण कोरिया, जपान आणि रोमानिया या देशांत ही अल्ट्रा हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिस आधीपासून उपलब्ध आहे. चीनचे इंटरनेट नेटवर्प वेगवान आहे यात शंका नाही. ते हिंदुस्थानच्या तुलनेत 100 पट जास्त वेगवान आहे हेसुद्धा खरे आहे, परंतु हे जगातील पहिले 10 जी नेटवर्प आहे हा दावा चुकीचा आहे. 10 जी ब्रॉडबँडमध्ये जी चा अर्थ गीगाबीट आहे. मोबाईल नेटवर्पमध्ये वापरले जाणाऱया जनरेशनच्या जीचा अर्थ वेगळा आहे. हे एक वायर्ड फायबर-ऑप्टिक इंटरनेट कनेक्शन आहे. जे 10 गीगाबीट प्रति सेकंदपर्यंत स्पीड देते. म्हणजेच 20 जीबीचा 4के चित्रपट केवळ 20 सेकंदांत डाऊनलोड करू शकता. याचा स्पीड जवळपास 9834 एमबीपीएसपर्यंत जातो, तर भारतातील सरासरी स्पीड सध्या 60 एमबीपीएसपर्यंत आहे. चीनने केवळ शियोंगान, शांघाय आणि ग्वांगडोंग या प्रमुख शहरांत ही सेवा सुरू केलीय.

हिंदुस्थान 87 व्या क्रमांकावर

हिंदुस्थान जगात इंटरनेटच्या बाबतीत 87 व्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानात मार्च 2025 पर्यंत सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड 58.62 एमबीपीएसपर्यंत आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांत इंटरनेट कंपन्या 1 जीबीपीएसपर्यंतच्या प्लानची जाहिरात करतात, परंतु खरा स्पीड केवळ 77 एमबीपीएसपर्यंत मिळतो. त्यापेक्षा जास्त मिळत नाही. 10 जी ब्रॉडब्रँड केवळ वेगवान इंटरनेटसाठी मर्यादित राहिलेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव आणि हल्ले आता संपले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण...
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार
India Pakistan Ceasefire : दोन्ही देशांमध्ये समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती – संरक्षण मंत्रालय
India Pakistan Ceasefire : युद्धविरामावर एकमत, पण दहशतवाद विरोधात कुठलीही तडजोड करणार नाही – एस जयशंकर
India Pakistan Tension – उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक! पाकिस्तानी हॅकर्सकडून दावा
India Pakistan Ceasefire – हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला, परराष्ट्र मंत्रालयाची शस्त्रसंधीची घोषणा