मुजफ्परपुरमध्ये हृदयद्रावक घटना! एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू तर चार जण गंभीर

मुजफ्परपुरमध्ये हृदयद्रावक घटना! एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू तर चार जण गंभीर

बिहारच्या मुजफ्परपुरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून घरात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर चार जणांची अवस्था गंभीर आहे,. आग आगली त्यावेळी संपूर्ण कुटुंब झोपलेले होते, त्यांना वाचविण्याची संधीही मिळाली नाही.

ही घटना मोतीपूरच्या वॉर्ड नंबर 13 मधील आहे, शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग लागली. घरातील सर्व झोपले असल्यामुळे बाहेर काढण्यासाठी त्यांना संधीही मिळाली नाही. आणि बघता बघता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्छानी गेले.

आगीच्या ज्वाळा वाढत असल्याचे पाहून स्थानिकांनी आरडाओरडा केला. घटनास्थळी गर्दी जमली. लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती इतकी भीषण होती की ती नियंत्रित करणे कठीण झाले. पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी भाजलेल्या चार जणांना वाचवले आणि त्यांना उपचारासाठी एसकेएमसीएच रुग्णालयात पाठवले. या अपघातात लालन साह, त्यांची आई, पत्नी आणि दोन मुले यांचा मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात या घटनेवर शोककळा पसरली आहे.

डीएसपी वेस्टर्न सुचित्रा कुमारी म्हणाल्या, “मोतीपूरमध्ये लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चार जण भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोटप्रकरणी पाचव्या डॉक्टरला अटक, दुसऱ्या दिवशी होते लग्न Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोटप्रकरणी पाचव्या डॉक्टरला अटक, दुसऱ्या दिवशी होते लग्न
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कारमधील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी...
शाळेत उशीरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला लावल्या, सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू
2 कोटी हिंदुस्थानींच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, मध्यमवर्गीयांवर मोठे संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
Sangameshwar News – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबाची चंदा वाघीण दाखल
गुंदवली मेट्रो स्थानकात बेवारस बॅग सापडली, बॉम्बशोधक पथकाला पाचारण
Bihar Election 2025 – पक्षाला नोटापेक्षा कमी मतं, निवडणुकीत झाला सुपडासाफ; निकाल लागताच उमेदवारानं रुग्णालयात सोडले प्राण
हरमनप्रीत कौर म्हणते; वर्ल्डकप विजयानंतर आयुष्यच बदलून गेलं, तो शेवटचा चेंडू…