Bihar Election 2025 – सरकारी तिजोरीतून 10-10 हजार वाटणं किती योग्य? निवडणूक आयोगानं विचार करावा, शरद पवार स्पष्टच बोलले

Bihar Election 2025 – सरकारी तिजोरीतून 10-10 हजार वाटणं किती योग्य? निवडणूक आयोगानं विचार करावा, शरद पवार स्पष्टच बोलले

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा शुक्रवारी निकाल असून एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. केंद्र सरकारने या निवडणुकीपूर्वी बिहारमधील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये टाकण्यात आले होते. याचाच हा परिणाम असून अधिकृत पैसे वाटपामुळे बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते बारामतीत माध्यमांशी संवाद साधत होते.

बिहार निवडणूक निकालाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मी काही काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला फिडबॅक मिळाला. ही निवडणूक महिलांनी हाती घेतली होती. महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये टाकल्याचा हा परिणाम असावा.

महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीआधी लाडकी बहीणच्या माध्यमातून अधिकृत पैसे वाटले होते आणि बिहारमध्येही तसेच झाले. इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करणे योग्य आहे का याचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, निवडणुका स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने व्हाव्याच याच्या बद्दल कुणाचे दुमत असायचे कारण नाही. पण 10-10 हजार ही काही लहान रक्कम नाही. विशेषत: याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी बारामतीत बघितले. महापालिकेची निवडणूक आली की मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट पाहायची. कशासाठी हे सांगायची गरज नाही.

वाटप झाले की निवडणुकीचे निकाल कसा यायचा ते दिसायचे. हे लहान प्रमाणावर होते, पण आता महिलांचे 50 टक्के मतदान असणाऱ्या राज्यात त्यांना 10-10 हजार रुपये देणे आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणे याचा अर्थ निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ नव्हत्या याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. ही शंका निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अख्खा देश जरी भाजपला मिळाला तरी त्यांचा जीव मुंबई महापालिकेतच अडकलाय, भास्कर जाधव यांची टीका अख्खा देश जरी भाजपला मिळाला तरी त्यांचा जीव मुंबई महापालिकेतच अडकलाय, भास्कर जाधव यांची टीका
बिहारमध्ये भाजप प्रणीत एनडीएला पाशवी बहुमत मिळाले आहे. याबाबत पत्रकारांनी भाजप नेते, आमदार भास्कर जाधव यांना विचारले असता त्यांनी भाजपवर...
Bihar Election 2025 – सरकारी तिजोरीतून 10-10 हजार वाटणं किती योग्य? निवडणूक आयोगानं विचार करावा, शरद पवार स्पष्टच बोलले
Parth Pawar land scam – विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, केली ‘ही’ मागणी
10 हजारात लोकशाही विकली जाते हे बिहारमध्ये दिसले, संजय राऊत यांचा निशाणा
IND vs SA Kolkata Test – शुभमन गिलने अचानक मैदान सोडलं, बॅटिंग करताना नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Delhi bomb blast – चारही दहशतवादी डॉक्टरांची प्रॅक्टिस कायमची बंद, NMC ने रजिस्टरमधून नावेही हटवली
रांचीमध्ये दुर्देवी घटना! हटिया धरणात न्यायाधीशांच्या दोन अंगरक्षकांसह तिघांचा बुडून मृत्यू तर एक जण बेपत्ता