हरमनप्रीत कौर म्हणते; वर्ल्डकप विजयानंतर आयुष्यच बदलून गेलं, तो शेवटचा चेंडू…

हरमनप्रीत कौर म्हणते; वर्ल्डकप विजयानंतर आयुष्यच बदलून गेलं, तो शेवटचा चेंडू…

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने उंची उडी मारून दक्षिण आफ्रिकेची अखेरची बॅटर क्लर्क हिचा झेल घेतला अन् हिंदुस्थानच्या महिला संघाने पहिल्यांदा आयसीसी वर्ल्डकप जिंकला. विश्वविजेत्या होण्याचे महिला संघाचे स्वप्न सत्यात उतरले आणि खेळाडूंसह मैदानावरील प्रेक्षकांनीही जल्लोष सुरू केला. या विजयानंतर आपले आयुष्य बदलून गेले असून तो शेवटचा चेंडू आपण किमान 1000 वेळा तरी पाहिला असेल, असे हरमनप्रीत कौर ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

वर्ल्डकप विजयानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. मी तो शेवटचा चेंडू किमान हजार वेळा पाहिला आहे. फक्त मीच नाही तर आमच्या संघ अनेक वर्षापासून या क्षणाची वाट पाहत होता. त्यामुळे मला तो क्षण पुन्हा पुन्हा पाहत रहावासा वाटतो, असे हरमनप्रीत म्हणाली.

झेल घेताना मनात काय विचार सुरू होते असे विचारले असता ती म्हणाली की, मला खरेच आठवत नाही की तो झेल घेतानी मी काय विचार करत होते. खरे तर हे शब्दात व्यक्त करणे कठीण असून या विजयाचे महत्त्व माझ्यासाठी खूप आहे. कारण मी नेहमी वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहिले आणि अखेर ते साध्यही केले. आता त्यास दोन आठवडे झाले असले तरी ती भावना खूर खास आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोटप्रकरणी पाचव्या डॉक्टरला अटक, दुसऱ्या दिवशी होते लग्न Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोटप्रकरणी पाचव्या डॉक्टरला अटक, दुसऱ्या दिवशी होते लग्न
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कारमधील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी...
शाळेत उशीरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला लावल्या, सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू
2 कोटी हिंदुस्थानींच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, मध्यमवर्गीयांवर मोठे संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
Sangameshwar News – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबाची चंदा वाघीण दाखल
गुंदवली मेट्रो स्थानकात बेवारस बॅग सापडली, बॉम्बशोधक पथकाला पाचारण
Bihar Election 2025 – पक्षाला नोटापेक्षा कमी मतं, निवडणुकीत झाला सुपडासाफ; निकाल लागताच उमेदवारानं रुग्णालयात सोडले प्राण
हरमनप्रीत कौर म्हणते; वर्ल्डकप विजयानंतर आयुष्यच बदलून गेलं, तो शेवटचा चेंडू…