थातूरमातूर ‘पॅकेज’ची घोषणा नको! हेक्टरी ५० हजार आणि कर्जमाफी करा, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

थातूरमातूर ‘पॅकेज’ची घोषणा नको! हेक्टरी ५० हजार आणि कर्जमाफी करा, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी. उगाच थातूरमातूर घोषणा करून जाऊ नये, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी हे ८ आणि ९ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येत असून ते विविध विकासकामांची उद्घाटने करणार आहेत, पण मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान कोणते विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहेत त्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा लाभपूरग्रस्त शेतकऱ्यांना व्हायला हवा असे सांगून शिवसेना पक्षप्रमुखांनी ठणकावले की, “संपूर्ण मराठवाडा आजही चिखलात आणि पाण्यात आहे. पिके, घरे, पशुधन तर गेलेच; पण जमीन साफ खरवडून गेली त्यावर किमान दोन पिढ्या पीक घेता येणार नाही. ४० लाख शेतकरी, ६० लाख एकर शेतीला पुराचा फटका बसला असून पंतप्रधानांनी ‘पॅकेज’ची धूळफेक न करता हेक्टरी ५० हजार थेट मदत आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी. पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आताच मदतीचा हात दिला नाही तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या नष्ट होतील. पूरग्रस्त शेतकऱ्यांतर्फे पंतप्रधानांना मी हात जोडून नम्र विनंती करीत आहे की, थातूरमातूर घोषणा न करता शेतकऱ्यांना जे हवे तेच द्या!”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM Ayushman Yojana Find Hospitals: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून अनेक योजना राबवत आहेत. त्यातील एक म्हणजे आयुष्मान भारत...
लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक फुलांची सजावट
नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांनी मदत केली पण त्यांनी त्याचे पांग कसे फेडले ते सर्वांनी बघितलं – संजय राऊत
महाकाल मंदिरात भस्मआरती दरम्यान भक्ताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी निमलष्करी दलावर मोठा हल्ला; BLA च्या हल्ल्यात 5 सैनिक ठार, दोनजण गंभीर जखमी
मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण
कामोठ्यात इमारतीला भीषण आग, आई व मुलीचा होरपळून मृत्यू