राज्यात ऊसगाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार

राज्यात ऊसगाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार

राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन 2025-26 या वर्षीचा ऊसगाळप हंगाम राज्यात 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरपासून कारखान्यांना गाळपास परवानगी दिली होती.

आगामी साखर कारखान्याच्या ऊसगाळप हंगामाचे धोरण ठरवून निर्णय घेण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. येत्या एक नोव्हेंबरपासून ऊसगळीत हंगाम सुरू करण्यासाठी गाळप परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन 5 रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा गाळप होणाऱया उसासाठी प्रति मेट्रिक टन 3, 550 रुपये एफआरपी, तर बेसिक उताऱयासाठी 10.25 टक्के देण्यात येणार आहे. गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून, यामध्ये 99 सहकारी व 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱयांना 31,301 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारने गळीत हंगामाची सुरुवात केली आहे. सीमाभागातील उसाची पळवापळवी होणार आहे. गेल्या वर्षी राज्याचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. परिणामी कर्नाटक राज्यात मोठय़ा प्रमाणात ऊस गेल्याने, यंदा तुलनेत लवकर हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सीमेवरील साखर कारखान्यांना स्थानिक शेतकऱयांची सोय आणि गाळपातील अडचणी टाळण्यासाठी राज्यातील गाळप हंगामापूर्वीच सुरू करण्याची परवानगी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सादरीकरण केले. बैठकीपूर्वी केंद्र शासनाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने, राज्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल दर्शविणाऱया चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते.

वेळेवर गाळप सुरू झाले तरच फायदा होईल. परतीच्या पावसाने उसाचा तोटा झाला तर भरपाईचीही तरतूद करावी लागेल. मागील हंगामातील चूक टाळल्याने कर्नाटकात जाणारा ऊस थांबेल. विदर्भ-मराठवाडय़ात आलेल्या महापुरामुळे कारखान्यांना ऊसतोडणी मजुरांचा तुटवडा जाणवू शकतो. कारखान्यांची आर्थिक देणी आणि एकरकमी एफआरपी आदींसाठी कारखान्यांना शासनाने आर्थिक मदत करावी लागेल.

– विजय औताडे

(साखर उद्योगाचे अभ्यासक)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली...
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?