म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत

म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाने 5,285 घरांच्या आणि सिंधुदुर्गातील ओरोस व कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीकरिता आयोजित सोडतीला दुसऱयांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार इच्छुकांना आता 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून 9 ऑक्टोबरला ठाण्यात सोडत काढण्यात येईल.

कोकण मंडळाच्या या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली 1677 घरे आणि म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 41 घरे तसेच 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रेकॉर्डब्रेक अर्ज

कोकण मंडळाच्या यंदाच्या सोडतीला रेकॉर्डब्रेक म्हणजेच मुंबईतील घरांच्या तोडीचे अर्ज आले आहेत. या सोडतीसाठी गुरुवारी 6.30 वाजेपर्यंत 1,52,205 अर्ज आले असून 1,19,038 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मुदतवाढ दिल्यामुळे अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

नवीन वेळापत्रकानुसार, या सोडतीसाठी 12 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज तर 13 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करता येणार आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात