बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाचीही हजेरी; मुंबई-ठाण्यासह 6 जिल्ह्यांना अलर्ट

बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाचीही हजेरी; मुंबई-ठाण्यासह 6 जिल्ह्यांना अलर्ट

जुलै महिन्यानंतर काही काळा विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या आठवड्यापासून चांगलीच बरसायला सुरुवात केली आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे गेल्या आठवड्यात मुंबई ठप्प झाली होती. त्यानंतर आता सर्वचजण लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज असताना वरुणराजाही हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मुंबई-ठाण्यासह 6 जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

बाप्पाचे बुधवारी स्वागत करण्यासाठी राज्यभरात तयारी जोरात सुरू आहे. यावेळी वरूणराजा हजेरी लावणार आहेच. मात्र त्याआधी मंगळवारी कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. आता मुंबईसाठी मंगळवारी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईप्रमाणेच नवी मुंबई व ठाणे या दोन्ही शहरांसाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील. नवी मुंबईतील खाड्यालगतच्या भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात या आठवड्याची सुरुवातच जोरदार पावसाने झाली आहे. त्यामुळे मंगळवारी पालघर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन कोकण जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार सरींचा अंदाज असून, काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, परंतु काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २९ ऑगस्टला मुंबई, ठाणे यासह कोकण आणि घाट माथ्यावर भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २९ तारखेला राज्यातील अंतर्गत भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर झडप बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर झडप
पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी रस्त्यावरील बारामती ॲग्रो परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही...
Vice President Election Results – सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड
पोस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत डॉक्टर दाम्पत्याकडे खंडणीची मागणी, चौघांविरोधात गुन्हा दाखल
एलईडी बल्ब फुफ्फुसात अडकला, साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी दिले जीवदान
Vice President Election – विरोधी पक्ष एकजूट, सर्व खासदारांनी केलं मतदान; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून जयराम रमेश यांचं वक्तव्य
Nepal Protests – रक्तरंजीत इतिहास विसरू शकत नाही…; नेपाळच्या खेळाडूची पोस्ट चर्चेत
Nepal Protest – हिंसक आंदोलनात माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, घर पेटवलं