देवाभाऊंचे नागपूर अर्ध्या तासाच्या पावसात बुडाले; घरांत पाणी, रस्ते तुंबले, वाहतुकीचे तीनतेरा

देवाभाऊंचे नागपूर अर्ध्या तासाच्या पावसात बुडाले; घरांत पाणी, रस्ते तुंबले, वाहतुकीचे तीनतेरा

महाविकास आघाडी सरकार एकीकडे विकासाच्या गप्पा मारत असताना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर फक्त अर्ध्या तासाच्या पावसाने बुडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. जोरदार पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले, तर रस्त्यात  पाणी तुंबल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले.

हवामान खात्याने गुरुवारी विदर्भ-मराठवाडय़ात विजांसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरवत पावसाने सकाळपासून जोरदार बरसायला सुरुवात केली. विजा आणि गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली. अवघ्या  अर्ध्या तासातच रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहनचालकांचीही तारांबळ उडाली.

रेल्वे स्थानक परिसरही जलमय

जोरदार पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरातही मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वे सब वेमध्येही पाणी शिरले. लोहापूल, नरेंद्र नगर, मेहदीबाग या सब वेमध्ये गुडघाभर पाणी शिरले. त्यामुळे हे सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. विशेष म्हणजे व्हीआयपी लोक राहणाऱ्या भागातही पाणी शिरले. तुंबलेल्या पाण्यातून जाणाऱ्या गाडय़ा बंद पडल्याने त्या ढकलत नेण्याची कसरत चालकांना करावी लागली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आळंदीत रंगणार महाराष्ट्र कारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद आळंदीत रंगणार महाराष्ट्र कारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद
एमआयटी कर्ल्ड पीस युनिक्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदतर्फे 19 ते 20 जुलै या कालावधीत ‘महाराष्ट्र कारकरी कीर्तनकार...
पॉवर कटमध्ये हिंदुस्थान जगात पुढे
‘तेल्या’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळे क्वारंटाईन, पापरीतील शेतकऱ्याचा डाळिंब बागेत प्रयोग
Mumbai Tragedy – वांद्र्यात रहिवासी चाळ कोसळली; 7 जखमी, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण; आज अक्कलकोट बंदची हाक, आरोपींना जामीन मंजूर
मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याची चूक झाली! 12 वर्षीय मुलाची व्यथा ऐकून सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचा निर्णय बदलला
दिल्लीतील 3 शाळांना बाॅम्बने उडवण्याची धमकी, बाॅम्ब शोध पथकाचा तपास सुरु