मजेशीर आहे… शिवसेनेच्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर टीका करणाऱ्या भाजपने त्याचाच जीआर काढला!आदित्य ठाकरे यांचा टोला

मजेशीर आहे… शिवसेनेच्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर टीका करणाऱ्या भाजपने त्याचाच जीआर काढला!आदित्य ठाकरे यांचा टोला

मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृहे कष्टकरी मुंबईकरांच्या सोयीसाठी चोवीस तास खुली ठेवली पाहिजेत अशी दूरदृष्टीपूर्ण संकल्पना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम मांडली होती. त्या संकल्पनेचे युवा पिढीने स्वागत केले होते. परंतु भारतीय जनता पक्षाने संस्कृती आणि संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. आता भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनेच त्यासंदर्भात जीआर काढून परवानगी बहाल केली. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. मजेशीर आहे…शिवसेनेच्या ’मुंबई 24/7’ धोरणावर टीका करणाऱया भाजपने त्याचाच जीआर काढला, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. कष्टकरी मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत जेवणाखाण्याची, थोडा निवांत आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात नक्की काय अडचण आहे? अशी विचारणा आपण त्यावेळी भाजपला केली होती. आजही पुन्हा तेच विचारतोय, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

भाजपचं मत आता नेमकं का बदललं?

“मुंबई कष्टकऱयांचं शहर आहे आणि हे शहर 24/7 धावतच राहतं. जानेवारी 2020 पासूनच हे धोरण अस्तित्वात आहे आणि तेव्हा भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. नवा अध्यादेश काढण्याची काही गरजच नव्हती. पण भाजपला आता आपलं मत बदलण्यास नेमकं काय कारणीभूत ठरलं?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासंदर्भात आलेल्या बातम्यांचा दाखलाही आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षण आनंदाचा… सण नात्यांचा! क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
‘मनसे’च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ‘दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या प्रवेशद्वारावर उभारलेली आकर्षक कमान आणि...
मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी, जुना मार्ग वापरण्याचा अनेकांचा सल्ला
महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री आहेत , 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची – विजय वडेट्टीवार
यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीचा भीषण अपघात; सात जण ठार
वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीमने केला निकाह; सोशल मीडियावर फोटो केले शेअर
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू