संगमनेरमध्ये नदीपात्रात वाहून गेलेल्या संदीप केरेचा 58 तासानंतर मृतदेह सापडला

संगमनेरमध्ये नदीपात्रात वाहून गेलेल्या संदीप केरेचा 58 तासानंतर मृतदेह सापडला

घरी परतत असताना दुचाकीसह वाहून गेलेल्या संदीप केरेचा मृतदेह तब्बल 58 तासांनी नदीपात्रात आढळून आला. चिखली गावातील काही तरुण नदीवर अंघोळीसाठी गेले असता त्यांना नदीकिनारी संदीपचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे चिखली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली, केरेवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि केरे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथे पाठवण्यात आला. त्यानंतर केरेवाडीत त्याच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

संदीप केरे हा रविवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान केस कापून आपल्या घरी परतत असताना दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेलेा होता. सलग दोन दिवस नातेवाईक, ग्रामस्थ आणि महसूल विभागाचे कर्मचारी संदीपचा शोध घेत होते. काल रात्री नऊ वाजेपर्यंत शोध घेऊनही ते कुठेही आढळून आले नाही. शोध लागत नसल्याने आणि रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. यानंतर बुधवारी नदीच्या कडेला संदीपचा मृतदेह आढळून आला. संदीपच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली...
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?