Mumbai News – एसटीची 10 टक्क्यांची भाडेवाढ रद्द; टीकेची झोड उठताच महायुती सरकारचा निर्णय

Mumbai News – एसटीची 10 टक्क्यांची भाडेवाढ रद्द; टीकेची झोड उठताच महायुती सरकारचा निर्णय

ऐन सणासुदीच्या काळात एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याच्या निर्णयातून अखेर महायुती सरकारने माघार घेतली आहे. दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटीच्या विविध बससेवांसाठी लागू केलेली 10 टक्क्यांची तिकीट दरवाढ अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ रद्दची घोषणा केली आहे.

राज्यावर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचे गंभीर संकट ओढवले असतानाही दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या भाडेवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावर चौफेर टीका होताच निर्णयाला 24 तास उलटण्याआधीच तो भाडेवाढ रद्द करण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे.

15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर यादरम्यान साधी निमआराम, शयन आसनी, शयनयान, वातानुकूलित शिवशाही (आसनी), जनशिवनेरी या बससेवेसाठी ही दरवाढ लागू असेल, असे एसटी महामंडळाने जाहीर केले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यभरातील एसटी प्रवाशांना जवळपास महिनाभर एसटीच्या प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार होते. ही भाडेवाढ रद्द करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनतेला पूरस्थिती आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली...
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?