द्राक्षबागांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या! द्राक्ष बागायतदार संघाची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

द्राक्षबागांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या! द्राक्ष बागायतदार संघाची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सांगली जिह्यात अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत; परंतु द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत, असा शासकीय नियम आहे. सध्याची परिस्थिती पाहाता द्राक्ष पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱयांना भरपाई मिळावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघातर्फे जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे. जिल्हा बागायतदार संघाच्या वतीने निवेदन आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले. यावेळी राज्य बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव तुकाराम माळी आदी उपस्थित होते.

सांगली जिह्यात गेली चार वर्षे अतिवृष्टी होत आहे. संपूर्ण शेती, शेतकरी अडचणीत आहेत. यावर्षी मेच्या सुरुवातीला गारपिट होऊन तासगाव, मिरज, जत, खानापूर, पलूस व वाळवा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणी, खरड छाटणीपासून साधारणतः 40 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये काडीवरील डोळ्यामध्ये सुप्त अवस्थेत सूक्ष्म घड निर्मिती होत असते. त्यासाठी कडक ऊन असण्याची आवश्यकता असते. परंतु याच काळात जिह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झालेले आहे.

खरड छाटणीनंतर काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होण्यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तसेच बागेत सतत पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्ष बागांच्या मुळ्या कुजून गेल्या. मुळ्या निक्रिय झाल्यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान होणार आहे. जिह्यामध्ये आज अखेर 90 टक्के द्राक्षबागांची फळछाटणी झालेली नाही. सप्टेंबर अखेरपर्यंत दरवर्षी 50 टक्के द्राक्षक्षेत्रावर फळछाटणी होत असते.

यंदा इतर पिकांचे नुकसान हे नजरेने दिसते; परंतु द्राक्षपिकाचे सद्यस्थितीतील नुकसान नजरेने दिसत नाही. सध्या इतर पिकांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, द्राक्ष पिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत, असा शासकीय नियम असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहाता फळधारणेस अडचणी येऊ शकतात, त्यामुळे पूर्ण वर्ष वाया जाणार आहे. सर्व पिकासाठी सरसकट नुकसानभरपाईमध्ये सांगली जिह्याचा समावेश राज्य शासनाने करावा, अशी मागणी द्राक्षे बागायतदार संघाने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
दिवसभर आपण बरीच काम करत असतो, प्रवास करत असतो. धुळ, प्रदूषण यामुळे नक्कीच आपण अनेक जंतूंच्या संपर्कात येतो. मग ते...
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम, एअरस्ट्राईकमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू
बीडचे वादग्रस्त जेलर पेट्रस गायकवाड यांची बदली