Sindhudurg news – 80 बसफेऱ्या अचानक बंद; प्रवाशांचे हाल

Sindhudurg news – 80 बसफेऱ्या अचानक बंद; प्रवाशांचे हाल

कुडाळ एसटी आगाराने श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी बुधवारी तब्बल 80 बसफेऱया अचानक बंद केल्या. गौरी गणपती सणानिमित्त जादा प्रवासी वाहतुकीसाठी आगाराच्या बसेस ठाणे येथे गेल्याने तसेच गणेश चतुर्थीदिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने कमी भारमानाअभावी या बसफेऱया एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला. मात्र, प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या निर्णयाने गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. काहींनी खासगी वाहनांचा आधार घेत घर गाठले. त्यांची मोठी आर्थिक परवड झाली.

गणेश चतुर्थीदिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी काही मार्गावर एसटीला भारमान कमी मिळते तसेच यंदा गौरी गणपतीनिमित्त जादा वाहतुकीसाठी आगाराच्या काही बसेस ठाणे येथे गेल्याने बुधवारी गणेश चतुर्थीदिवशी विविध मार्गांवरील
80 बसफेऱया एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला. याबाबत अचानक मंगळवारी रात्री फलक बसस्थानकात लावण्यात आला. त्यामुळे कोकण रेल्वेने गावी दाखल झालेल्या, मालवण व अन्य भागात जाणाऱया मुंबईकर चाकरमान्यांसह गणेशभक्तांची गैरसोय झाली.

ऐन गणेशोत्सवात कोकणवासीयांची घोर फसवणूक, टोलमाफीचा पास देऊनही टोलवसुली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात