IND Vs BAN – टीम इंडियाचा बांगलादेश दौरा एक वर्षांसाठी स्थगित, BCCI ने सांगितलं कारण

IND Vs BAN – टीम इंडियाचा बांगलादेश दौरा एक वर्षांसाठी स्थगित, BCCI ने सांगितलं कारण

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार होती. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार होती. परंतु आता BCCI ने मोठा निर्णय घेत टीम इंडियाचा बांगलादेश दौरा डिसेंबर 2026 पर्यंत स्थगित केला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि बीसीसीआयने सहमतीने दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान होता. परंतु आता हा दौरा एक वर्षांसाठी स्थगित करण्यात आला आहे. BCCI ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “दोन्ही क्रिकेट बोर्डाने चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन्ही संघांचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि वेळापत्रक या सर्व गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत. बीसीबीने स्पष्ट केलं आहे की बीसीबी 2026 मध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश मालिकेसाठी उत्सुक आहे. या मालिकेच्या नवीन तारखा अधिकृतपणे नंतर घोषित करण्यात येतील.” अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्त होऊन आठ महिने झाले तरी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मुक्काम सरकारी बंगल्यात, प्रशासनाची केंद्राकडे धाव निवृत्त होऊन आठ महिने झाले तरी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मुक्काम सरकारी बंगल्यात, प्रशासनाची केंद्राकडे धाव
माजी सरन्यायाधीस डॉ. डी. वाय चंद्रचूड यांचा पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरी त्यांनी आपले अधिकृत निवासस्थान रिकामे केलेले नाही. या...
ती नकली दाढी अमित शहा कधी कातरतील कळणारही नाही, संजय राऊत यांचा जबरदस्त टोला
मिस्टर फडणवीस, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तुमची रुदाली सुरू – संजय राऊत
नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली, राहुल गांधी यांची टीका
Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम!
महासागर उसळला… अफाट, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय!
हिंदी सक्तीसाठी छत्रपतींचा अपमान… सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार भडकले