महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले; संजय राऊत यांचा प्रहार

महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले; संजय राऊत यांचा प्रहार

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या कटुता आणि द्वेष दिसून येतो. महाराष्ट्राचे राजकारण याआधी असे कधीच नव्हते. राज्याच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणि विष पेरण्याचे काम भाजपने केले आहे. याआधी महाराष्ट्रातील राजकारण असे कधीच नव्हते. ओठांवर एक आणि पोटात वेगळेच असे मराठी माणसांच्या राज्यात महाराष्ट्रात कधीच नव्हते.यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासूनचे राजकारण आम्ही पाहिले आहे. त्यांच्यासारख्या टोलजंग व्यक्तीला भेटण्याची संधी आम्हाला लाभली.

सध्या शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांवरही संजय राऊत यांनी मत व्यक्त केले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासाठी त्यांच्याकडे अनेक संस्था आहेत. राजकीयदृष्ट्या ते एकत्र आले किंवा नाही, याची माहिती नाही. मात्र, आजही शरद पवार त्यांच्या पक्षाच्या संघटनासाठी आणि बळकटीकरणासाठी काम करत आहेत.सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सर्व पक्षांचा बांधणीसाठी जिवाचे रान करत आहेत. ते एकत्र आले असतील तर ते त्यांच्या संस्थेच्या कामासाठी आले असतील, असेही ते म्हणाले. मात्र, कोणी एकत्र आले किंवा दुरावा निर्माण झाला तर त्याचा संबंध थेट राजकारणाशी जोडला जातो. मात्र, राजकारणाव्यतिरिक्तही नाती, जिव्हाळा असतो. तो जपला तर त्यात काय गैर आहे. राज्याचे राजकारण भाजपने गढूळ केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत मॉक ड्रीलदरम्यान काय होणार, ब्लॅकआऊट कुठे आणि कधी? जाणून घ्या A टू Z माहिती मुंबईत मॉक ड्रीलदरम्यान काय होणार, ब्लॅकआऊट कुठे आणि कधी? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार (7 मे) देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल केले जाणार आहे. महाराष्ट्रातील...
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही, न्यायालयाचा हा निर्णय आश्वासक – सुप्रिया सुळे
मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी
Pahalgam Attack : रशियानंतर आता या ताकदवान इस्लामिक देशाने PM MODI यांच्याशी हस्तांदोलन, भारताला दिला संपूर्ण पाठींबा
गर्लफ्रेंडसोबत असल्यावर घरी असलेल्या बायकोसाठी…, विवाहबाह्य संबंधाचा शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चात्ताप
Rain Update – मुंबई नाशिकसह महाराष्ट्रात पावसाचं मॉक ड्रिल, नागरिकांची तारांबळ