मुंबईवर पाणीकपातीचे संकट, पाणीसाठा आला 28 टक्क्यांवर

मुंबईवर पाणीकपातीचे संकट, पाणीसाठा आला 28 टक्क्यांवर

मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्या माऱ्याने मुंबईकर हैराण झाले असताना वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठाही आटत चालला आहे. मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28 टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, सध्या तरी पाणीकपातीचा कोणताही विचार नाही. मात्र, 15 मेपर्यंत तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल, असे जल अभियंता विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते; परंतु यंदा सातही धरणांत 4 लाख 11 हजार 355 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

तर मुंबईकडे असेल जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी 

राज्य सरकारने मुंबईला 2 लाख 30 हजार 500 मिलियन लिटर राखीव साठा तत्त्वतः उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्यावेळी पाणीसाठा अगदीच कमी होईल त्यावेळी राज्य सरकारच्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून हा साठा घेण्यात येईल. हा राखीव साठा घेतला तर मुंबईकरांना जुलैअखेरपर्यंत पाण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र, याबाबतचा निर्णय मे महिन्याच्या पहिल्या किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात घेतला जाईल, असे जल अभियंता विभागाने सांगितले.

21 एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा     –                     68,312

मोडक सागर   –    29,268

तानसा           –    33,131

मध्य वैतरणा –    66,494

भातसा           –   1,99,854

विहार             –    11,105

तुळशी            –      3,190

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यानंतर त्यांनी...
सासरच्यांनी केला छळ, पतीचा हॉस्पिटलचे बिल भरण्यास नकार…; वयाच्या 45व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा मृत्यू
दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा
Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
VIDEO छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रीलचा सराव
Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही – राहुल गांधी
मधुमेही रुग्णांसाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा सविस्तर