Ratnagiri News – सततच्या पावसामुळे सुपारी फळाला फटका; नुकसानीच्या पंचनाम्यांचा प्रशासनाला विसर

Ratnagiri News – सततच्या पावसामुळे सुपारी फळाला फटका; नुकसानीच्या पंचनाम्यांचा प्रशासनाला विसर

यंदा अतिवृष्टीमुळे सुपारी पिकालाही मोठा फटका बसला आहे. फळ परिपक्व होण्याआधीच फळगळती सुरू झाली आहे. अतिवृष्टीमुळे भात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र त्यात सुपारी पिकाचा समावेश नसल्याने सुपारी बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

धार्मिक विधींपासून ते माऊथ फ्रेशनर बनवण्यासाठी सुपारीचा वापर केला जातो. सुपारी फळाची लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात आहे. अशा या सुपारी पिकाला फळगळीचे ग्रहण लागून सुपारीची कोवळी फळे गळून खाली पडली आहेत. अतिपावसामुळे सुपारीला कोळेरोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळेच फळगळ होत असल्याचा सुपारी बागायतदारांचा दावा आहे.

शेतकऱ्यांनी फळगळ थांबण्यासाठी फवारण्यादेखील केल्या. परंतु त्याचा तितकासा परिणाम झाला नाही. झाडावरील 70 टक्क्यांपेक्षा अधिक फळे जमिनीवर पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि दापोली तालुका सुपारी संघाचे अध्यक्ष मधुकर दळवी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना लेखी पत्र देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अखिलेश यादव यांनी दावा...
Photo – भाजपला धक्का! डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ
शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही – संजय राऊत
Ratnagiri News – सततच्या पावसामुळे सुपारी फळाला फटका; नुकसानीच्या पंचनाम्यांचा प्रशासनाला विसर
दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मी आता हा ताण सहन करू शकत नाही; पश्चिम बंगालमध्ये आणखी एका BLO ने कामाच्या दबावामुळे जीवन संपवले