हिंदुशिवाय हे जग नष्ट होऊन जाईल, मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

हिंदुशिवाय हे जग नष्ट होऊन जाईल, मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

”हिंदू संस्कृती अमर आहे, जर हिंदू संस्कृती नष्ट झाली तर संपूर्ण जग नष्ट होईल, असे मोठे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर येथे एका सभेत बोलताना केले आहे. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच सरसंघचालक मणिपूरच्या दौऱ्यावर आले आहेत.

”जगातील सर्व देशांनी सर्व प्रकारची परिस्थिती बघितली आहे. ग्रीसमध्ये युआन, इजिप्तची मिस्र, रोमची एक वेगळी संस्कृती होती. या संस्कृती नष्ट झाल्या आहेत मात्र हिंदू संस्कृती टिकून आहे. आपल्या संस्कृती काहीतरी नक्की आहे जे आपण अजुनही टिकून आहोत”, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू संस्कृतीचे कौतुक केले.

”भारत हे एका अशा सभ्यतेचे संस्कृतीचे नाव आहे जी अमर आहे. आपण आपल्या समाजात एक असं बंधन तयार केलं आहे की ज्यामुळे हिंदू समाज हे कायम इथे राहणार. जर हिंदु नष्ट झाले तर हे जग नष्ट होईल”, असे देखील ते म्हणाले.

गेल्या अडीच वर्षापासून मणिपूर धगधगत आहे. कुकी आणि मैतेई समाजात उसळलेल्या हिंसाचारामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोकांनी स्थलांतर केले आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट असून या हिसांचारानंतर प्रथमच मोहन भागवत तेथे दौऱ्यावर आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – धारावीत भीषण आग, माहीम-वांद्रे दरम्यान लोकल विस्कळीत Mumbai News – धारावीत भीषण आग, माहीम-वांद्रे दरम्यान लोकल विस्कळीत
धारावीतील 60 फूट रोडवरील सेनापती बापट रोडजवळील माहीम रेल्वे फाटकाजवळील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडली. आगीमुळे माहिम...
दिवाळखोरीद्वारे पोटगीची जबाबदारी टाळू शकत नाही, हायकोर्टाकडून विभक्त पत्नीला दिलासा
देवदर्शनासाठी जात असताना सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघात, 5 भाविक जागीच ठार; 7 ते 8 जण जखमी
विठाबाईच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरने वाढवले 15 किलो वजन, लावणी करताना पाय झाला फ्रॅक्चर
दिल्ली पोलिसांनी पाकड्यांचा डाव उधळला; ड्रोनद्वारे पाठवलेल्या शस्त्रांचा साठा पकडला, चौघांना अटक
बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? गिरीश महाजनांसारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा! – रोहित पवार
ट्रेनमध्ये मॅगी शिजवणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल होताच मध्य रेल्वेकडून महिलेवर कारवाई