जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

जालन्यात गाडी जाळण्याच्या संशयातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

जालन्यातील भवानीनगरात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज 22 नोव्हेंबर रोजी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सागर भगवान आगलावे (18) जय भवानीनगर,जुना जालना असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील शनिवारी जालना शहरातील भवानीनगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जाळण्याच्या संशयातून 2 ते 3 जणांनी रोडने बेदम मारहाण केली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना गंभीर अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचा सकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अखिलेश यादव यांनी दावा...
Photo – भाजपला धक्का! डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ
शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही – संजय राऊत
Ratnagiri News – सततच्या पावसामुळे सुपारी फळाला फटका; नुकसानीच्या पंचनाम्यांचा प्रशासनाला विसर
दिसला भूखंड की ढापायचा, ही महायुतीची नीतीच आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मी आता हा ताण सहन करू शकत नाही; पश्चिम बंगालमध्ये आणखी एका BLO ने कामाच्या दबावामुळे जीवन संपवले