वसईतील नव्या पुलाने एमआयडीसीतील रहिवाशांची नाकाबंदी, शिवसेनेने उठवला आवाज

वसईतील नव्या पुलाने एमआयडीसीतील रहिवाशांची नाकाबंदी, शिवसेनेने उठवला आवाज

वसई पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पूल तोडून नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे काम करताना पूर्व बाजूस जाण्यासाठी रस्ताच न ठेवल्याने एमआयडीसी परिसरातील नोकरदार तसेच रहिवाशांना वळसा घालून इच्छितस्थळी ये-जा करावी लागत आहे. यामुळे हजारो नागरिकांची ‘नाकाबंदी’ होत असून याविरोधात शिवसेनेने आवाज उठवत पूर्वेकडील रहिवासी आणि कारखानदारांसाठी पूर्वीप्रमाणेच नवीन पुलावर पूर्व बाजूस उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

खाडीवर असलेला हा नवीन पूल आधी महापालिका बांधणार होती, परंतु आता या पुलाचे काम मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन करत आहे. पूर्व बाजूस असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ उतरण्यासाठी जुन्या पुलावर एक मार्गिका होती. मात्र नवीन पुलाचे काम करताना आता पूर्वेकडे जाण्यासाठी मार्गिका ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्या पुलावरही जुन्या पद्धतीनेच पूर्व बाजूस उतरण्यासाठी मार्ग ठेवावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सचिव राजाराम बाबर यांनी रेल्वे कॉर्पोरेशनकडे केली आहे.

जुना पूल सात मीटर रुंद होता. तो आता ११ मीटर करण्यात आल्याने नरवीर चिमाजी आप्पांच्या स्मारकाच्या कामालाही बाधा येणार आहे. पूर्वेला पेट्रोलपंपाजवळच चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येणार असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही द्रविडी प्राणायाम करावा लागत आहे.

फ्रान्सिस फर्नांडिस, उपाध्यक्ष, वसई इंडस्ट्रीयल असो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांची उचलबांगडी अखेर पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांची उचलबांगडी
महापालिकेच्या घनकचरा विभागातील भोंगळ कारभार अखेर उपायुक्त संदीप कदम यांच्या पदावर गदा आणून गेला आहे. अनेक दिवसांपासून असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर...
शहापूरमधील आदिवासींना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
डोंबिवलीतील बेशिस्त चालकांच्या दंडाचा फैसला, 12 डिसेंबरला लोक अदालत
वसईतील नव्या पुलाने एमआयडीसीतील रहिवाशांची नाकाबंदी, शिवसेनेने उठवला आवाज
अमित ठाकरेंवरील गुन्हा कदापि मान्य नाही, तो मागे घ्या! वनमंत्री गणेश नाईक यांचे स्पष्ट प्रतिपादन
घाटकोपर येथे ज्येष्ठ नागरिकाची हत्या
नवी मुंबईतील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर