नोकर कपातीत कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन पॅकेज, रतन टाटांची शिकवणी विसरली नाही ‘टीसीएस’

नोकर कपातीत कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन पॅकेज, रतन टाटांची शिकवणी विसरली नाही ‘टीसीएस’

देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सध्या मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहे. यामुळे कंपनीवर टीका होत आहे. कंपनीवर जबरदस्तीने राजीनामे घेण्याचे आरोपदेखील होत आहेत. या पार्श्वभूमीवर टीसीएसने एक महत्त्वपूर्ण आणि ठोस पाऊल उचलले आहे. रतन टाटांच्या शिकवणीनुसार, कंपनीने कामावरून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी काही महत्त्वपूर्ण व ठोस पावले उचलली आहेत. या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचे वेतन पॅकेज (सेवेरन्स पॅकेज) देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून त्यांना नव्या संधी शोधण्यासाठी आवश्यक वेळ आणि स्थैर्य मिळणार आहे.

बदलत्या ग्राहक मागण्या, वाढता ऑटोमेशनचा वापर आणि नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी टीसीएसने नोकर कपात सुरू केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची भूमिका आणि कौशल्ये सध्याच्या कंपनीच्या गरजांशी सुसंगत नाहीत, त्यांना या नोकर कपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्यम व वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांना या पुनर्रचनेचा सर्वाधिक परिणाम भोगावा लागू शकतो, असे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी टीसीएसने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंतचे वेतन द्यायची तयारी दर्शवली आहे. रतन टाटांच्या निधनानंतरही टाटा समूहात त्यांच्या मूल्यांचा वारसा जिवंत असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टाटांची ऑफर नेमकी काय?

प्रभावित कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम तीन महिन्यांचा नोटीस पगार (नोटीस पे) दिला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या सेवेचा कालावधी आणि पदानुसार अतिरिक्त सेवा वेतन देण्यात येईल, ज्याचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत असू शकतो. 15 वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच ‘बेंच’वर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा प्रस्ताव आहे. हे असे कर्मचारी असतात जे सतत आठ महिन्यांहून अधिक काळ कोणत्याही प्रोजेक्टवर कार्यरत नसतात. सामान्यपणे अशा कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या नोटीस पगारापुरतेच पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र 10 ते 15 वर्षांपर्यंत सेवा केलेल्या बेंच कर्मचाऱ्यांना सुमारे 1.5 वर्षांचे वेतन पॅकेज मिळू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 11 महिला आणि 4...
जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल
दापोलीत व्हेल माशाची उलटी जप्त; एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 आरोपींना अटक
दिल्लीत JNU विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांसोबत धक्काबुक्की; 28 विद्यार्थी ताब्यात
Mumbai News – बनावट सोन्याची बिस्किटे देऊन दागिने घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी देता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप, भाविकांमधून तीव्र नाराजी; मंदिर समितीकडून बिव्हिजी कंपनीला नोटीस