शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा,उद्धव ठाकरे करणार नेतृत्व; छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर 11 ऑक्टोबरला धडक

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा,उद्धव ठाकरे करणार नेतृत्व; छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर 11 ऑक्टोबरला धडक

सर्वांना अन्नाचा घास देणारा महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्याची शेती आणि संसार पाण्यात वाहून गेला. पाणावलेल्या डोळय़ांनी बेंबीच्या देठापासून ओरडून तो मायबाप सरकारकडे मदत मागतोय. पण निर्दयी महायुती सरकार त्याचे आर्जव ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांसाठी धावून गेली आहे. शेतकऱ्यांचा आवाज बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना हंबरडा फोडणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्तालयावर विराट हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे.

अतिवृष्टीमुळे त्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना त्वरित थेट आर्थिक मदत मिळावी, संपूर्ण कर्जमुक्ती दिली जावी, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावेत, पीक विम्याचे नवीन निकष रद्द करून पूर्वीचेच निकष कायम ठेवावेत, घरे आणि पशुधन नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी या मागण्यांसाठी 5 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत शिवसेनेच्या वतीने मराठवाडय़ात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली.

मोर्चाआधी गाव बैठका आणि निदर्शने
 5 ते 7 ऑक्टोबर – ग्रामसभा, गावभेटी आणि गावबैठका
 8 ऑक्टोबर – प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आणि निदर्शने

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील...
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता
Photo – क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
पंजाबमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; लुथियानाहून दिल्लीला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, एक महिला जखमी