आनंदवार्ता! कैलास मानसरोवर यात्रेची तारीख ठरली, असा असेल मार्ग

आनंदवार्ता! कैलास मानसरोवर यात्रेची तारीख ठरली, असा असेल मार्ग

हिंदुस्थान व चीनमध्ये 2020 ला झालेल्या डोकलाम संघर्षानंतर थांबवण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे यात्रेकरूंचा आनंद द्विगुणीत झाला आहे. ही यात्रा 30 जून 2025 पासून सुरू होणार आहे. उत्तराखंडच्या लिपुलेख खिंडीतून चीनच्या तिबेट प्रदेशात असलेल्या कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावापर्यंत ही यात्रा असेल. यात्रेसंदर्भात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये यात्रेच्या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

कैलास मानसरोवर यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. पण, ही मानसरोवर यात्रा गेल्या 5 वर्षांपासून बंद होती. कोरोना माहामारीमुळे 2020 मध्ये ही यात्रा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेला रक्तरंजित संघर्ष, तणाव आणि सीमावादामुळे यात्रा पुन्हा सुरू होऊ शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही यात्रा 30 जून रोजी सुरू होणार असून यामध्ये एकूण 250 यात्रेकरू सहभागी होणार आहेत. या यात्रेकरूंची 5 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 50 यात्रेकरू असणार आहेत. ही यात्रा 22 दिवसांची असणार आहे.

कसा असेल यात्रेचा मार्ग
– दिल्लीपासून टनकपूर ( 1 रात्र )
– टनकपूरपासून धारचूला (1 रात्र)
– गुंजी (2 रात्र)
– नाभीढांग (2 रात्र) यांनतर लिपुलेख दर्रेपासून तकलाकोट (चीन)मध्ये प्रवेश

परतीचा मार्ग-
– बुंडी (पिथौरागढ़) 1 रात्र
– चौकोरी 1 रात्र
– अल्मोडा 1 रात्र यानंतर यात्री दिल्लीला रवाना

असा यात्रेचा मार्ग असणार आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रकरूंची आरोग्य चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी आधी दिल्लीत आणि मग गुंजीला केली जाईल. कुमाऊं मंडल विकास निगम (KMVN) हे या संपूर्ण यात्रेचे संचलन करतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल… पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल…
आपण खात असलेले अन्न आणि आरोग्य यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. तुम्हाला निरोगी राहायचे असेल केवळ पोषक तत्वांनी समृद्ध अन्न...
समुद्राची पातळी इतक्या वेगाने का वाढत आहे? नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून चालकासह तिघांचा मृत्यू
मुंबईत मॉक ड्रीलदरम्यान काय होणार, ब्लॅकआऊट कुठे आणि कधी? जाणून घ्या A टू Z माहिती
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही, न्यायालयाचा हा निर्णय आश्वासक – सुप्रिया सुळे
मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी