नायजेरियातील शाळेतून ३०३ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांचे अपहरण, चार दिवसात दुसरी घटना

नायजेरियातील शाळेतून ३०३ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांचे अपहरण, चार दिवसात दुसरी घटना

नायजेरियाच्या नायजर राज्यातील सेंट मेरी स्कूलवर काही बंदूकधारींनी हल्ला करून ३०३ मुले आणि १२ शिक्षकांचे अपहरण केले, असे वृत्त ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने शनिवारी दिले. अद्याप कोणत्याही गटाने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. चार दिवसांपूर्वी केब्बी राज्यातील मागा शहरातही २५ शाळकरी मुलांचे असेच अपहरण करण्यात आले होते. नायजेरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नोआ रिबाडू अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला झाला.

सेंट मेरी कॅथोलिक प्रायमरी आणि सेकंडरी शाळा ही को-एज्युकेशनल संस्था असून, ती नायजर राज्यातील दुर्गम पापिरी परिसरात आहे. हल्लेखोरांनी शाळेच्या डोमेटरींमध्ये घुसून विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि जंगलाकडे नेले. CAN नुसार, हे अपहरण ‘बॅंडिट्स’ने (सशस्त्र गुन्हेगारी गँग) केले असावे, जे पैसे मागण्यासाठी अपहरण करतात. अद्याप कोणत्याही गटाने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नायजेरियातील शाळेतून ३०३ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांचे अपहरण, चार दिवसात दुसरी घटना नायजेरियातील शाळेतून ३०३ विद्यार्थी आणि १२ शिक्षकांचे अपहरण, चार दिवसात दुसरी घटना
नायजेरियाच्या नायजर राज्यातील सेंट मेरी स्कूलवर काही बंदूकधारींनी हल्ला करून ३०३ मुले आणि १२ शिक्षकांचे अपहरण केले, असे वृत्त ख्रिश्चन...
ऐका, अजितदादांचा नवा इतिहास… यशवंतरावांनी हिंदवी स्वराज स्थापले! परतूरच्या जाहीर सभेत दादांची आदळआपट
SIR साठी आणखी किती लोकांचे बळी घेणार? निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला संताप
Nanded News – सरकारी कर्मचाऱ्याकडून आईचा प्रचार, कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्या विरोधात आयोगात तक्रार
विकास आणि निष्ठा हे शब्द राजकारण्यांनी बदनाम केले – डॉ.राजन गवस
श्रीनगरमधील बटमालूमध्ये एसआयएचा छापा, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित आणखी एका संशयिताला अटक
उत्तर प्रदेशात मतचोरी करण्यासाठी भाजप आणि निवडणूक आयोग बनवत आहेत रणनीती, अखिलेश यादव यांचा आरोप