बांगलादेशात सत्तापालटानंतर दीड वर्षांनी होणार निवडणुका, मोहम्मद युनूस यांची घोषणा

बांगलादेशात सत्तापालटानंतर दीड वर्षांनी होणार निवडणुका, मोहम्मद युनूस यांची घोषणा

बांगलादेशातील हंगामी सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपूर्वी बांगलादेशमध्ये संसदीय निवडणुका होतील, अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल.

मोहम्मद युनूस यांनी ही घोषणा करताना राष्ट्रीय एकमत आयोगाने दिलेल्या दोन शिफारशींचा उल्लेख केला. जुलै महिन्यातील राष्ट्रीय चार्टरची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रस्ताव आहेत. पहिल्या शिफारशीनुसार, विशेष आदेशांद्वारे घटनात्मक सुधारणा करून त्यावर जनमत घेण्यात येईल. संसदीय निवडणुका आणि जनमत एकाच दिवशी घेण्यात येतील. जनमताने सुधारणा मंजूर झाल्यास, नवीन संसद घटना सुधार परिषद स्थापन करेल आणि २७० दिवसांत सुधारणा पूर्ण करेल. अन्यथा प्रस्तावित सुधारणा आपोआप घटनेत समाविष्ट होतील. दुसऱ्या शिफारशीनुसार, सुधारणा २७० दिवसांत पूर्ण कराव्या लागतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आलिशान गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करा; सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण सूचना
देशातील विविध महानगरांमध्ये वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण सूचना केली आहे. देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक...
बांगलादेशात सत्तापालटानंतर दीड वर्षांनी होणार निवडणुका, मोहम्मद युनूस यांची घोषणा
आईला मुलाकडून पोटगी मागण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
Bihar Election 2025 – आम्ही स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करत आहोत, मतमोजणी आधी तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास
लग्नाआधी जोडीदाराला या तीन चाचण्या करायला लावाच, तिसरी चाचणी फारच महत्त्वाची, नाहीतर आयुष्यभर रडत बसण्याची येईल वेळ
माहेरून परतत असताना काळाचा घाला, दुभाजकावर धडकून कार पेटली; सहा महिन्यांच्या गर्भवतीचा होरपळून मृत्यू
Ratnagiri News – सहा प्रभागात भाजपकडून बंडखोरीची शक्यता, शिंदे गटाला अधिक जागा सोडल्याने अनेकांचे पत्ते कट