अमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना; जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षकांवर, गृहखात्याकडून 22 कोटींचा निधी

अमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना; जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षकांवर, गृहखात्याकडून 22 कोटींचा निधी

राज्यातील अमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अमली पदार्थविरोधी टास्क पर्ह्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून या पर्ह्सच्या स्थापनेसाठी राज्याच्या गृहखात्याने 22 कोटी 36 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अमली पदार्थांची विक्री व सेवनाच्या मुद्दय़ावरून सर्वपक्षीय सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेत भाग घेताना सदस्यांनी अमली पदार्थांच्या रॅकेटप्रकरणी सत्ताधाऱयांना जबाबदार धरले होते. एका वर्षात अमली पदार्थाच्या विक्रीत 481 टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी विधिमंडळात सादर झाली होती. काही महिन्यांपूर्वी 30 दिवसांच्या विशेष कारवाईत 140 कोटी 20 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. विधिमंडळातील या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमली पदार्थाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी टास्क पर्ह्सची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

या टास्क पर्ह्ससाठी 346 नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,  पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, चालक अशा विविध पदांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील...
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता
Photo – क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
पंजाबमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; लुथियानाहून दिल्लीला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, एक महिला जखमी