उद्धव ठाकरे- राज ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत, त्यामुळे ते विनोदी विधाने करत आहेत – संजय राऊत

उद्धव ठाकरे- राज ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत, त्यामुळे ते विनोदी विधाने करत आहेत – संजय राऊत

देवेंद्र फडणवीस सरकारची निर्मितीच खोक्यातून झाली आहे, त्यामुळे फडणवीस यांनी खोक्यावर बोलून नये, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. तसेच कैलास गोरंट्याल यांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. तसेच ही निवडणूक भाजपने कशी जिंकली आहे, ते आता जनतेला समजले आहे, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारची निर्मिती खोक्यांतून झालेली आहे. 50 खोके, एकदम ओके, ही घोषणा कोणी दिली? या घोषणेचा जनक कैलाश गोरंट्याल आहे. ते त्यावेळी जालन्याचे आमदार होते. त्यांनी विधानसभा सुरु असताना ही घोषणा दिली आणि नंतर ती देशभरात पसरली. आता ही घोषणा देणार गोरंट्याला फडणवीस यांच्या पक्षात आहेत. त्यांनीच आता असे सांगितले आहे की, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकाएका मतदारसंघात 100-100 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सरकारी वाहने आणि पोलिसांच्या वाहनातून हे पैशांचे वाटप सुरू होते. आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्यामुळे आपल्याला भाजपमध्ये यावे लागले, असे गोरंट्याल म्हणाले आहेत. त्यामुळे खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या 100 जागांवर फेरीफेरी करत विजय मिळवला आहे, त्याबाबत फडणवीस यांनी बोलावे, त्यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या भ्रष्ट मंत्री असून त्यांची खोक्यांची ओढताण सुरू आहे, त्याबाबत त्यांनी बोलायला पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांच्या आतम्हत्या होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, त्याबाबत फडणवीस यांनी बोलले पाहिजे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत, या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत, त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत. त्यांची वक्तव्ये विनोद समजून सोडून दिली पाहिजेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG 5th Test – मोहम्मद सिराजची चुक महागात पडणार! हॅरी ब्रुक-जो रुटची दमदार खेळी, इंग्लंड भक्कम स्थितीत; पाहा Video IND Vs ENG 5th Test – मोहम्मद सिराजची चुक महागात पडणार! हॅरी ब्रुक-जो रुटची दमदार खेळी, इंग्लंड भक्कम स्थितीत; पाहा Video
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेला पाचवा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग...
कधी कधी गमतीत… बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांकडून बचाव
Ratnagiri News – महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी चिपळूणात धडक आंदोलन, महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार
Happy Friendship Day… युती धर्माच्या हतबलतेमुळे शिरसाटांना अर्थ खातं मिळणारच, मुख्यमंत्र्यांना टॅग करत आदित्य ठाकरे यांचा चिमटा
फडणवीससाहेब, महाराष्ट्राची बेअब्रू होतेय… आवरा आपल्या मंत्र्यांना; रोहित पवार यांची टीका
Video कानाखाली मारेन, बडतर्फ करेन; भर सभेत मंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला धमकी
Ratnagiri News – गणपती बाप्पा मोरया… यंदाही खड्डे भरूया! ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची धावाधाव