बिल भरण्यावरून वाद टोकाला, ग्राहकाकडून हॉटेल मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला

बिल भरण्यावरून वाद टोकाला, ग्राहकाकडून हॉटेल मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला

बीडमधील हत्यासत्र थांबण्याचे नावच घेत नाही. बिल भरण्यावरून झालेल्या वादातून ग्राहकाने हॉटेल मालकासह त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी माजलगावमध्ये घडली. या हल्ल्यात हॉटेल मालकाचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव मार्गावरील नागडगाव पाटी कॉर्नर येथे महादेव गायकवाड यांचा गावरान ढाबा आहे. या ढाब्यावर शनिवारी सायंकाळी आरोपी रोहित शिवाजीराव थावरे हा मित्रांसोबत जेवायला आला होता. यावेळी हॉटेलच्या बिलावरून रोहितचा मालक आणि त्यांच्या मुलासोबत वाद झाला.

वाद विकोपाला गेला आणि रोहितने मित्रांसह मिळून महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत पिता-पुत्राला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सहा जणांविरेधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी
मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळताना...
Pahalgam Attack : रशियानंतर आता या ताकदवान इस्लामिक देशाने PM MODI यांच्याशी हस्तांदोलन, भारताला दिला संपूर्ण पाठींबा
गर्लफ्रेंडसोबत असल्यावर घरी असलेल्या बायकोसाठी…, विवाहबाह्य संबंधाचा शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चात्ताप
Rain Update – मुंबई नाशिकसह महाराष्ट्रात पावसाचं मॉक ड्रिल, नागरिकांची तारांबळ
IPL 2025 – जॅक्सचे अर्धशतक, सूर्याची साथ; पण मधल्या फळीने दगा दिला, मुंबईचे गुजरातपुढे 156 धावांचे आव्हान
बुधवारी रत्नागिरीत पाच ठिकाणी मॉक ड्रील, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे आवाहन
हिंदुस्थानने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल – विजय वडेट्टीवार